शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने मिळाली अस्मिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:27 IST

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषम समाजव्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा लढा व्यापक केला.

ठळक मुद्देआज महापरिनिर्वाण दिन : जिल्ह्यात विविध संघटनांकडून आदरांजली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषम समाजव्यवस्थेशी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा लढा व्यापक केला. त्यांच्या संघर्षामुळेच कोट्यवधी जनतेला अस्मिता आणि दिशा मिळाली. नवी पिढी आता बाबासाहेबांच्या विचारांचा कालसापेक्ष विचार करून वाटचाल करीत आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध संघटनांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दिवसभर व्याख्यान, चर्चासत्र आणि विधायक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित जनतेला सन्मानाने उभे राहण्याची ताकद दिली. नागपूर आणि चंद्रपूर येथे ऐतिहासिक धम्म सोहळा घेऊन परिवर्तनाचा संदेश दिला. हजारो वर्षांच्या गुलामगिरीला मुठमाती देवून उजेडाचा वारसा बहाल केला. भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायाला अनुसरून क्रांतिकारी तरतुदी केल्या. त्यामुळे कोट्यवधी जनतेला विकास करण्याची संधी मिळाली. डॉ. आंबेडकरांचा चंद्रपूर शहराशी ऐतिहासिक संबंध होता. सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते या शहरातून तयार केले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हे नाव नव्या पिढीसमोर आदर्श म्हणून उभे आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीवर धर्मांतर सोहळा घेण्याची क्रांतिकारी घटना या देशात पहिल्यांदाच घडली. या ऐतिहासिक लढ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. नागपुरातील धर्मांतर सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी चंद्रपूर शहराला प्राधान्य दिले. १९५६ मध्ये धम्मदीक्षा सोहळा चंद्रपुरात घेतल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले होते. हजारो वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या शोषित समाजात अस्मिता पेरण्याचे काम चंद्रपुरातील धम्मदीक्षा सोहळ्याने केले. यातून अनेक पिढ्या परिवर्तनाच्या चळवळीत सामील झाल्या. राजकीय वाटचाल भरकटले असले, तरी सामाजिक व सांस्कृतिक संघर्षासाठी दलित समाज आजही नव्या उमेदीने लढा देत आहे. बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि, सांस्कृतिक वातावरणात डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनाचा विचार समाजमनात रुजविण्याचे काम करीत आहे. व्यवस्थेशी संघर्ष करण्याचे माध्यम बदलले. नव्या माध्यमांचा वापर करून संविधानाला अपेक्षित समाज घडविण्यासाठी संघर्ष करणाºया अनेक संघटना, व्यक्ती, कार्यकर्ते प्रामाणिकपणे कार्य करीत असल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परिवर्तनवादी उपक्रम राबवून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.चंद्रपुरात आज अस्थिकलश यात्रासमता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्तकोतर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनापासून यात्रेची सुरुवात होईल. कस्तुरबा रोड, गिरणार चौक, गांधी चौक मार्गातून ही यात्रा बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पोहचेल. विविध संघटनांकडून पुतळ्याला मार्लापण केल्यानंतर बुद्ध वंदना होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानचे गौतमी डोंगरे, संयोजक प्रवीण खोब्रागडे व अन्य मान्यवर उपस्थित राहतील. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.