शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

आशा वर्कर, कर्मचाऱ्यांना सत्य माहिती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:01 IST

घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गदीर्ही करू नये, हेही बघावे लागत आहे. जिल्ह्यांमध्ये सोमवारी एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. विदेशातून आलेल्या २८ लोकांना १४ दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचे आवाहन : जिल्हाभरात आरोग्य सर्वेक्षणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून आवाहन करतानाच जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत पोहोचविण्यासाठी गंभीरतेने प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरोघरी येणाºया आशावर्कर व कर्मचाऱ्यांना योग्य माहिती, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी केले.घरातील कोणी एका सुदृढ माणसाने या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी गरज असेल तरच ओळखपत्रासह बाहेर पडावे. अन्यथा कोणीही बाहेर पडून आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासन करत आहे. जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपाययोजना करताना नागरिकांनी गदीर्ही करू नये, हेही बघावे लागत आहे. जिल्ह्यांमध्ये सोमवारी एकही पॉझिटिव्ह रूग्ण आढळला नाही. विदेशातून आलेल्या २८ लोकांना १४ दिवसांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.आतापर्यंत ९५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वारंटाईन पूर्ण केले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. रविवार पाठवण्यात आलेल्या ९ पैकी ८ नमुने निगेटिव्ह आले. एका नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.जिल्ह्याच्या सीमा सर्व बाजूंनी बंद करण्यात आल्या आहे. प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरू आहे. गावापासून तर चंद्रपूर सारख्या महानगरांमध्ये आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे जर कुणी आजारी असेल तर त्याची माहिती कळवावी. कोरोना हा आजार योग्य उपचाराने काही दिवसांच्या कालावधीत संपूर्णत: बरा होऊ शकतो. त्यामुळे वेळीच औषधोपचार व संपर्कात न येणे हेच यावरचे उपाय असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.भाडेकरूंना सक्ती करू नकासध्या सर्वांना घरीच बसून राहण्याचे निर्देश दिले असल्यामुळे व व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या किरायेदाराकडून सध्याच घर मालकांनी किरायाची सक्ती करू नये. याचा अर्थ किराया माफ झाला असे नव्हे. तर केवळ या महिन्यासाठी घेऊ नये, हा किराया पुढील महिन्यात घ्यावा. यासोबतच त्याला घर खाली करायला सांगू नये, असे निर्देश केंद्र शासनाकडून आले आहेत.संस्थांनी आर्थिक मदत करावीमुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या माध्यमातून कोरोना संदर्भात लोकोपयोगी कामे हाती घेतली जात आहे. ही लढाई आणखी काही दिवस चालणार असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.खासगी रूग्णालये सुरूकोरोना आजारामुळे नागरिक दहशतीत आहेत. अशावेळी आजारांसाठी त्यांना वैद्यकीय सल्ला आणि योग्य उपचारही आवश्यक असतात. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनचे संबंधित सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करण्याचे मान्य केले.स्थानिक उद्योग तयार करणार सॅनिटायझरजिल्ह्यामध्ये सॅनिटायझर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व कारखाने सुरू करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक अत्यावश्यक आस्थापनावरील प्रमुख व्यक्तीने आपल्या कर्मचाºयांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. ज्या कामगारांचा संबंध जीवनावश्यक वस्तूंशी आहे. त्या सर्वांनी ओळखपत्र सोबत ठेवून कामावर पोहोचावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या