शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

By admin | Updated: February 17, 2016 00:52 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला

बल्लारपूर: तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला होता. दरम्यान, मंगळवारी भल्या पहाटे शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजता बामणी (दुधोली) येथील शेतशिवारात घडली. यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.विनोद मोतीराम आलाम (३५) असे जखमीचे नाव असून तो बामणी (दुधोली) येथील रहिवासी आहे. सदर शेतकऱ्यांवर अस्वलाने जबर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र अती रक्तस्त्रावामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले. विनोद आलाम नेहमीप्रमाणे गावाजवळच्या भागरथी नाल्याजवळील शेतात जागलीसाठी गेला. पहाटे ५ वाजता शेताची पाहणी करीत असताना अचानक अस्वलाने त्याचेवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी एका ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. हा प्रकार बामणी (दुधोली) चे माजी उपसरपंच संतोष टेकाम यांना देण्यात आली. त्यांच्यासह गावकऱ्यांनी गंभीर अवस्थेत विनोदला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. वडेट्टीवार यांना देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)