शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

By admin | Updated: February 17, 2016 00:52 IST

तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला

बल्लारपूर: तालुक्यातील बामणी (दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागरथी नाल्याजवळील शेतात एक शेतकरी जागलीला गेला होता. दरम्यान, मंगळवारी भल्या पहाटे शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजता बामणी (दुधोली) येथील शेतशिवारात घडली. यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.विनोद मोतीराम आलाम (३५) असे जखमीचे नाव असून तो बामणी (दुधोली) येथील रहिवासी आहे. सदर शेतकऱ्यांवर अस्वलाने जबर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाला असून मृत्यूशी झुंज देत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र अती रक्तस्त्रावामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले. विनोद आलाम नेहमीप्रमाणे गावाजवळच्या भागरथी नाल्याजवळील शेतात जागलीसाठी गेला. पहाटे ५ वाजता शेताची पाहणी करीत असताना अचानक अस्वलाने त्याचेवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी एका ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. हा प्रकार बामणी (दुधोली) चे माजी उपसरपंच संतोष टेकाम यांना देण्यात आली. त्यांच्यासह गावकऱ्यांनी गंभीर अवस्थेत विनोदला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. याची माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. वडेट्टीवार यांना देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)