शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

अजगराच्या अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता.  ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी  चौखुंडे यांना अजगराला अंड्यांतून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली.

ठळक मुद्देचिचपल्ली वनपरिक्षेत्रातील एका शेतात आढळले होते अजगराचे अंडे

भोजराज गोवर्धनलोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेताच्या पाळीवर अजगरासह अंडी असल्याची माहिती वासुदेव चौखुंडे या शेतकऱ्याने येथील संजीवन पर्यावरण संस्थेला दिली. संस्थेचे अध्यक्ष उमेषसिंह झिरे यांनी शेतात जाऊन अजगराला पकडून जंगलात निसर्गमुक्त केले आणि अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म दिला.  अजगराच्या सर्व पिल्लांनाही बुधवारी निसर्गमुक्त केले. कृत्रिम पद्धतीने अजगराच्या पिल्लांना जन्म दिल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता.  ही माहिती क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी  चौखुंडे यांना अजगराला अंड्यांतून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, साहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना देण्यात आली. क्षेत्र साहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे, स्वप्निल आक्केवार, प्रशांत केदार, अंकुश वाणी, दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले व अजगराची अंडी ताब्यात घेतली. अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे कक्ष क्रमांक ७५१ मध्ये निसर्गमुक्त केले. अजगर सापाच्या अंड्याला वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना त्या अंड्यांची योग्य काळजी घेतल्यानंतर पंधरा ते सोळा अंड्यांतून २० जुलै रोजी अजगराची चार पिल्ले बाहेर निघाली. या घटनेमुळे  आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कृत्रिमरीत्या अजगराची अंडी उबवून पिल्ले निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अजगराच्या चारही पिल्लांना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२२ येथील नाल्याशेजारी सुरक्षितपणे सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक सुभाष मरसकोल्हे,  उमेशसिंह झिरे, स्वप्निल आक्केवार, तन्मयसिंह झिरे, अंकुश वाणी, दिनेश खेवले, चेतन बोकडे, जय मोहुर्ले, रितेश पीजदूरकर, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, रूपेश खोब्रागडे, अक्षय दुम्मावार उपस्थित होते.

 

टॅग्स :snakeसाप