शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र ...

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र पाणी बिल न भरण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. यामुळे ऐन हिवाळ्यात गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ग्रामीण नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असे नागरिकांना वाटत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतने पाण्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. काही गावात पाणीपुरवठा योजनेस दोन वीज मोटारपंप असल्याची माहिती आहे. मात्र यातील दोन्ही मोटारपंप बंद असल्याने गावात पाणीपुरवठा बंद असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात हातपंप आहे, मात्र ते नादुरुस्त असल्याने तिथूनही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरीतील पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. पैसाच नसल्याने मोटारपंप दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे.

बाॅक्स

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना वीज कनेक्शन नसल्याने तर काही मोटारपंप बंद असल्याने या योजनेला अखेरची घरघर लागली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.