शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र ...

चंद्रपूर : गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. नागरिकांकडून पाणीपट्टी नियमित वसूल करून ते भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र पाणी बिल न भरण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. यामुळे ऐन हिवाळ्यात गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

ग्रामीण नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अनेक गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल असे नागरिकांना वाटत होते. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, ग्रामपंचायतने पाण्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. काही गावात पाणीपुरवठा योजनेस दोन वीज मोटारपंप असल्याची माहिती आहे. मात्र यातील दोन्ही मोटारपंप बंद असल्याने गावात पाणीपुरवठा बंद असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात हातपंप आहे, मात्र ते नादुरुस्त असल्याने तिथूनही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विहिरीतील पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. पैसाच नसल्याने मोटारपंप दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे.

बाॅक्स

गावातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत. काही पाणीपुरवठा योजना वीज कनेक्शन नसल्याने तर काही मोटारपंप बंद असल्याने या योजनेला अखेरची घरघर लागली आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.