शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

गोंडपिंपरीत कृत्रिम पाणी टंचाई

By admin | Updated: May 12, 2016 01:07 IST

शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या.

नागरिक त्रस्त : नगर पंचायत प्रशासनाने लक्ष द्यावेगोंडपिपरी : शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या. यासाठी शासनाने प्रादेशिक, ग्रामीण व जल प्राधिकरणाच्या अनेक योजनांमार्फत कोट्यवधींचा निधी खर्चून जनतेला पाणी पुरविण्याचे कार्य होत आहे. मात्र दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या कुप्रथेमुळे आता जनसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचा प्रत्यय गोंडपिंपरी शहरात दिसून येत आहे. शहरात नगरपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. मात्र याच नळ योजनेतील काही नळ कनेक्शन धारकांनी शुद्ध पाणी साठवणुकीसाठी टिल्लू पंपाच्या वापरातून अतिरिक्त पाणी उपसत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड जात आहे. तालुक्यातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहे. या कूपनलिका व विहीरीच्या पाण्यामुळे विविध आजार होत असल्याने नळ योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्याची मागणी अधिक आहे. शहराचा पाणी पुरवठा येनबोथला नदीवरून तर शुद्धीकरण सुरगाव येथून होत असल्याने शहरातील प्रभाग १, २ व ३ या प्रभागातून पाणी वाटपाला सुरूवात होते. तर प्रभाग ४, ५, ६ ७ व ८ या प्रभागामध्ये सार्वजनिक नळ, बाजारपेठ व दाट वस्ती असल्याने येथे मुबलक पाणी पुरवठा करणे व ९ ते १७ या प्रभागापर्यंत पाणी पोहचविणे हे नळ योजनेचे उद्दिीट आहे. मात्र नदीपासून येणाऱ्या जलवाहिन्यांमधून नेहमीच पाणी गळती तर शहराच्या मध्यभागातून व शेवटपर्यंत असलेल्या लोकवस्तीतील काही टिल्लू पंपधारक या नळयोजनेच्या प्रणालीत अडथळा निर्माण करतात. अनेक नागरिक अतिरिक्त पाणी उपसा करण्यात यशस्वी ठरत आहेत. परिणामी इतर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची पाळी आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीने या विरोधात ठोस पाऊस उचलून टिल्लू पंपधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र असे असले तरी नगरपंचायतीच्या कारवाईला न जुमानता काहींकडून आजही नळयोजनेच्या पाण्याचा गैरकायदेशीर उपसा सुरूच आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना कारवा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)