शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत कृत्रिम पाणी टंचाई

By admin | Updated: May 12, 2016 01:07 IST

शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या.

नागरिक त्रस्त : नगर पंचायत प्रशासनाने लक्ष द्यावेगोंडपिपरी : शासनाने जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेता प्रत्येक नागरिकाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी नळयोजना कार्यान्वित केल्या. यासाठी शासनाने प्रादेशिक, ग्रामीण व जल प्राधिकरणाच्या अनेक योजनांमार्फत कोट्यवधींचा निधी खर्चून जनतेला पाणी पुरविण्याचे कार्य होत आहे. मात्र दुसऱ्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या कुप्रथेमुळे आता जनसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचा प्रत्यय गोंडपिंपरी शहरात दिसून येत आहे. शहरात नगरपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेमार्फत नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविल्या जाते. मात्र याच नळ योजनेतील काही नळ कनेक्शन धारकांनी शुद्ध पाणी साठवणुकीसाठी टिल्लू पंपाच्या वापरातून अतिरिक्त पाणी उपसत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड जात आहे. तालुक्यातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहे. या कूपनलिका व विहीरीच्या पाण्यामुळे विविध आजार होत असल्याने नळ योजनेद्वारे मिळणाऱ्या पाण्याची मागणी अधिक आहे. शहराचा पाणी पुरवठा येनबोथला नदीवरून तर शुद्धीकरण सुरगाव येथून होत असल्याने शहरातील प्रभाग १, २ व ३ या प्रभागातून पाणी वाटपाला सुरूवात होते. तर प्रभाग ४, ५, ६ ७ व ८ या प्रभागामध्ये सार्वजनिक नळ, बाजारपेठ व दाट वस्ती असल्याने येथे मुबलक पाणी पुरवठा करणे व ९ ते १७ या प्रभागापर्यंत पाणी पोहचविणे हे नळ योजनेचे उद्दिीट आहे. मात्र नदीपासून येणाऱ्या जलवाहिन्यांमधून नेहमीच पाणी गळती तर शहराच्या मध्यभागातून व शेवटपर्यंत असलेल्या लोकवस्तीतील काही टिल्लू पंपधारक या नळयोजनेच्या प्रणालीत अडथळा निर्माण करतात. अनेक नागरिक अतिरिक्त पाणी उपसा करण्यात यशस्वी ठरत आहेत. परिणामी इतर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची पाळी आहे. या संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीने या विरोधात ठोस पाऊस उचलून टिल्लू पंपधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र असे असले तरी नगरपंचायतीच्या कारवाईला न जुमानता काहींकडून आजही नळयोजनेच्या पाण्याचा गैरकायदेशीर उपसा सुरूच आहे. परिणामी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना कारवा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)