शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कपातीमुळे चंद्रपुरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:30 IST

पावसाळ्याचे दिवस सुरु असताना ही चंद्रपूरकरांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीकर पूर्ण का घेण्यात येतो, असा प्रश्न उपस्थित करीत महानगर पालिकेने यंदाचा पाणी कर हा निम्मा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : पाणी कर निम्मा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरु असताना ही चंद्रपूरकरांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीकर पूर्ण का घेण्यात येतो, असा प्रश्न उपस्थित करीत महानगर पालिकेने यंदाचा पाणी कर हा निम्मा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच चंद्रपुरात सुरु असलेली पाणी कपात पावसाळ्याच्या अखेरही सरूच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची भटकंती थांबण्याची आशा असलेल्या चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास झाला आहे. अशी स्थिती असतानाही मनपा पाणी टंचाई असल्याचे मान्य करायला तयार नाही. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पाण्यासाठी पानीपत सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. याचा नाहक त्रास चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे.त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाने यावर्षी पाणी कर हा अर्धा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अनेक प्रभागात चार दिवसाआड पाणीपुरवठाशहरातील काही प्रभागात चक्क चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सद्या गणपती उत्सव सुरू असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला लाभ पोहोचविण्याचे कार्य होत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. तसेच शहरात पाणी कपात सुरू असल्याने मनपाने पाण्याच्या करात कपात करीत निम्मा कर घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.