शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेची देवाणघेवाण आवश्यक

By admin | Updated: January 19, 2017 00:55 IST

माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो.

चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात समारंभबल्लारपूर : माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. सुरुवातीला तो घरातून नंतर शाळेतून तद्नंतर समाजातून शिक्षण घेत असतो. यातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. या कलागुणांची देवाण-घेवाण व्यक्तीमत्त्व विकासासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.महाराजा लॉन येथे किरणाश्रय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘चला वाटू या वाण कलागुणांचे’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले, नगरसेविका रेणूका दुधे, ज्योती भूते, अश्विन मुसळे, रणजित डवरे, प्रशांत विघ्नेश्वर, मधु कपूर, मंगेश देशमुख, जयश्री मोहूर्ले, आशा संगीडवार, पूनम निरंजने, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, सोनम सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेविका मधू कपूर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविकात किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले यांनी संस्थेचे उद्देश विषद केला. त्यानंतर अन्य पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन, योगा, नाटिका आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी लोणचे, आवळ्याचे पदार्थ, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण शेख यांनी दिले. संचालन मिना झाडे यांनी तर आभार शुभांगी भेंडे यांनी आभार मानले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)