शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेची देवाणघेवाण आवश्यक

By admin | Updated: January 19, 2017 00:55 IST

माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो.

चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात समारंभबल्लारपूर : माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. सुरुवातीला तो घरातून नंतर शाळेतून तद्नंतर समाजातून शिक्षण घेत असतो. यातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. या कलागुणांची देवाण-घेवाण व्यक्तीमत्त्व विकासासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.महाराजा लॉन येथे किरणाश्रय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘चला वाटू या वाण कलागुणांचे’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले, नगरसेविका रेणूका दुधे, ज्योती भूते, अश्विन मुसळे, रणजित डवरे, प्रशांत विघ्नेश्वर, मधु कपूर, मंगेश देशमुख, जयश्री मोहूर्ले, आशा संगीडवार, पूनम निरंजने, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, सोनम सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेविका मधू कपूर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविकात किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले यांनी संस्थेचे उद्देश विषद केला. त्यानंतर अन्य पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन, योगा, नाटिका आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी लोणचे, आवळ्याचे पदार्थ, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण शेख यांनी दिले. संचालन मिना झाडे यांनी तर आभार शुभांगी भेंडे यांनी आभार मानले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)