शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

व्यक्तिमत्त्व विकासासाठी कलेची देवाणघेवाण आवश्यक

By admin | Updated: January 19, 2017 00:55 IST

माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो.

चंदनसिंह चंदेल यांचे प्रतिपादन : बल्लारपुरात समारंभबल्लारपूर : माणूस कितीही मोठा झाला तरी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विद्यार्थीच असतो. सुरुवातीला तो घरातून नंतर शाळेतून तद्नंतर समाजातून शिक्षण घेत असतो. यातून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होत असतो. या कलागुणांची देवाण-घेवाण व्यक्तीमत्त्व विकासासाठी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.महाराजा लॉन येथे किरणाश्रय सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘चला वाटू या वाण कलागुणांचे’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले, नगरसेविका रेणूका दुधे, ज्योती भूते, अश्विन मुसळे, रणजित डवरे, प्रशांत विघ्नेश्वर, मधु कपूर, मंगेश देशमुख, जयश्री मोहूर्ले, आशा संगीडवार, पूनम निरंजने, सुवर्णा भटारकर, सारिका कनकम, सोनम सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेविका मधू कपूर यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविकात किरणाश्रयच्या अध्यक्षा किरण बुटले यांनी संस्थेचे उद्देश विषद केला. त्यानंतर अन्य पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नृत्य, गायन, योगा, नाटिका आदी स्पर्धा पार पडल्या. यावेळी लोणचे, आवळ्याचे पदार्थ, विविध प्रकारचे सरबत बनविण्याचे प्रशिक्षण शेख यांनी दिले. संचालन मिना झाडे यांनी तर आभार शुभांगी भेंडे यांनी आभार मानले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)