शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कलासौंदर्य प्रवाशांनीही जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:12 IST

ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे.

ठळक मुद्देदररोज प्रवाशी काढतात छायाचित्रे : पर्यटकांना होत आहे निसर्गभ्रमंतीचा आभास

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे. हे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी आता रेल्वे प्रशासन व प्रवाशांनी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.भारतीय रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा देशातील सर्वात सुंदर व देखणे रेल्वेस्थानक म्हणून गौरव केला आहे. ही अत्यंत गौरवाची गोष्ट असून यामुळे या रेल्वे स्थानकाकडे प्रवाशी आकर्षिले जात आहेत. सामान्य लोकांनाही येथील नाविन्यपूर्ण सौंदर्य बघण्याची उत्कंठा आहे. या रेल्वे स्थानकावरून जाणारी प्रत्येक गाडी दहा ते पंधरा मिनीटपर्यंत येथे थांबतेच! या अवधीत गाडीमधील हौशी आणि कलाप्रेमी प्रवाशी फलाटावर उतरून या चित्र सौंदर्याचे पुतळ्यांचे अवलोकन करून त्यांचे फोटो काढतात. सेल्फी चित्र घेतात. अतुल्य भारत ही रेल्वेची खास पर्यटन गाडी या स्थानकावरून दक्षिण भारताकडे परवा गेली. या गाडीत देशातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बघणारे पर्यटक होते. ही खास गाडी या स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबली होती. या वेळात या गाडीतील पर्यटकांनी भिंतीवर रेखाटलेली चित्र बघितले. पुतळ्यांसोबत फोटो काढलेत. ‘लोकमत’ने यातील काही प्रवाशांना विचारले असता, बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील चित्र आणि पुतळ्यांबाबत ऐकले होते. ते आम्हाला प्रत्यक्ष बघता आले. हे सारे बघून ताडोबा आणि या भागातील वनसंपदा कशी संपन्न आहे याची कल्पना आली. हे सारे आम्ही कॅमेऱ्यात बंद केल्याने ते आमच्या संग्रही राहणार आहेत, असे ते हे चित्र आणि पुतळे यावर प्रतिक्रिया देत म्हणाले. राज्याचे वन, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेने बल्लारपूर रेल्वे स्थानक वेधक चित्र आणि पुतळ्यांनी सजल्याने या रेल्वे स्थानकाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, हे महत्त्व कायम ठेवण्याकरिता या चित्रांची आणि पुतळ्यांची देखरेख आणि निगा राखणे, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचे कारण लोकांचे वागणे ! लोकांनी पुतळे जवळून बघावेत, त्यांची छायाचित्रे काढावीत हे मान्य ! पण, काही जण पुतळ्यावर बसून, त्याला हात लावून फोटो काढतात. पुतळ्यांना हलवून बघतात. हरणाचे कळप, बगडे यांचे पुतळे नाजुक आहेत. लोकांनी पुतळ्यांना हात लावू नये, हलवून बघू नये, वाघ आणि रेड्या या पुतळ्यावर बसू नये, असे सूचनाफलक पुतळ्यांजवळ लावायला हवेत. तसे अजून लावलेले नाहीत. रेल्वे सुरक्षा यंत्रणेने या पुतळ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या कला सौंदर्याने, सुशोभिकरणाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशात मानाचे स्थान मिळाले आहे. त्या मानाची, नावाची जपणूक येथील चित्र आणि पुतळे यांची क्षति होऊ नये याची दक्षता प्रवाशी आणि बल्लारपूरवासीयांनी घेण्याची गरज आहे.