शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कलासौंदर्य प्रवाशांनीही जपण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:12 IST

ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे.

ठळक मुद्देदररोज प्रवाशी काढतात छायाचित्रे : पर्यटकांना होत आहे निसर्गभ्रमंतीचा आभास

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ताडोबा जंगलातील पशू पक्षी, वनवैभव, आदिवासींची जीवनशैली याबाबत चित्र रंगवून आणि प्राण्यांचे, त्यांच्या कळपासह पुतळे फलाटावर मोक्याच्या जागी उभे करून बल्लारपूर (बल्लारशाह) रेल्वे स्थानकाला सजवून शोभिवंत केले आहे. हे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी आता रेल्वे प्रशासन व प्रवाशांनी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.भारतीय रेल्वे प्रशासनाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाचा देशातील सर्वात सुंदर व देखणे रेल्वेस्थानक म्हणून गौरव केला आहे. ही अत्यंत गौरवाची गोष्ट असून यामुळे या रेल्वे स्थानकाकडे प्रवाशी आकर्षिले जात आहेत. सामान्य लोकांनाही येथील नाविन्यपूर्ण सौंदर्य बघण्याची उत्कंठा आहे. या रेल्वे स्थानकावरून जाणारी प्रत्येक गाडी दहा ते पंधरा मिनीटपर्यंत येथे थांबतेच! या अवधीत गाडीमधील हौशी आणि कलाप्रेमी प्रवाशी फलाटावर उतरून या चित्र सौंदर्याचे पुतळ्यांचे अवलोकन करून त्यांचे फोटो काढतात. सेल्फी चित्र घेतात. अतुल्य भारत ही रेल्वेची खास पर्यटन गाडी या स्थानकावरून दक्षिण भारताकडे परवा गेली. या गाडीत देशातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ बघणारे पर्यटक होते. ही खास गाडी या स्थानकावर सुमारे पाऊण तास थांबली होती. या वेळात या गाडीतील पर्यटकांनी भिंतीवर रेखाटलेली चित्र बघितले. पुतळ्यांसोबत फोटो काढलेत. ‘लोकमत’ने यातील काही प्रवाशांना विचारले असता, बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील चित्र आणि पुतळ्यांबाबत ऐकले होते. ते आम्हाला प्रत्यक्ष बघता आले. हे सारे बघून ताडोबा आणि या भागातील वनसंपदा कशी संपन्न आहे याची कल्पना आली. हे सारे आम्ही कॅमेऱ्यात बंद केल्याने ते आमच्या संग्रही राहणार आहेत, असे ते हे चित्र आणि पुतळे यावर प्रतिक्रिया देत म्हणाले. राज्याचे वन, अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेने बल्लारपूर रेल्वे स्थानक वेधक चित्र आणि पुतळ्यांनी सजल्याने या रेल्वे स्थानकाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, हे महत्त्व कायम ठेवण्याकरिता या चित्रांची आणि पुतळ्यांची देखरेख आणि निगा राखणे, दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचे कारण लोकांचे वागणे ! लोकांनी पुतळे जवळून बघावेत, त्यांची छायाचित्रे काढावीत हे मान्य ! पण, काही जण पुतळ्यावर बसून, त्याला हात लावून फोटो काढतात. पुतळ्यांना हलवून बघतात. हरणाचे कळप, बगडे यांचे पुतळे नाजुक आहेत. लोकांनी पुतळ्यांना हात लावू नये, हलवून बघू नये, वाघ आणि रेड्या या पुतळ्यावर बसू नये, असे सूचनाफलक पुतळ्यांजवळ लावायला हवेत. तसे अजून लावलेले नाहीत. रेल्वे सुरक्षा यंत्रणेने या पुतळ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या कला सौंदर्याने, सुशोभिकरणाने बल्लारपूर रेल्वे स्थानकाला देशात मानाचे स्थान मिळाले आहे. त्या मानाची, नावाची जपणूक येथील चित्र आणि पुतळे यांची क्षति होऊ नये याची दक्षता प्रवाशी आणि बल्लारपूरवासीयांनी घेण्याची गरज आहे.