शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विंजासन येथे भिक्खु संघाचे आगमन

By admin | Updated: October 29, 2016 00:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास ...

आज बौद्ध महोत्सव : वर्षावास समापनानिमित्त कार्यक्रमभद्रावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा वर्षावास समापनानिमित्त ऐतिहासीक विंजासन बुद्ध लेणी येथे वर्षावास आयोजन समितीच्या वतीने २९ आॅक्टोबर रोजी विराट बौद्ध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी आज शुक्रवारी देश विदेशातील ५० पेक्षा ज्यास्त भिक्खू संघाचे विंजासन बुद्ध लेणी येथे आगमन झाले.उद्या शनिवारला दुपारी १२ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त डॉ. राहुल बोधी (विपश्यनाचार्य, मुंबई), भदन्त सदानंद महाष्यवीर, सत्यशिल महाष्यवीर, भदन्त खेमधम्मो महास्थवीर, भदन्त कृपाशरण महास्थवीर आणि भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बोडाले यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळू धानोरकर तर स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मुख्याधिकारी विनोद जाधव, अनुसूचित जनजाती वित्त आयोग, भोपाळचे माजी अध्यक्ष इंद्रेश गजभिये, उपासक सन्नी थायलंड, दिनेश पाटील, डॉ. चंद्रबोधी नाईक, डॉ. पुरण मेश्राम, डॉ. सुरजीत सिंग हे उपस्थित राहणार आहे. समितीचे मार्गदर्शक विनयबोधी डोंगरे, सिद्धार्थ सुमन, लिना जुनघरे, कोषाध्यक्ष निलेश पाटील, सचिव संजय खोब्रागडे, उपाध्यक्ष जयदेव झाडे यांच्या मार्गदर्शनात सदर आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी भिक्खु संघाच्या उपस्थितीत अखंड महापरित्राण सुत पठण या ठिकाणी पार पडले. बौद्ध महोत्सवाला संघनायक भदन्त सदानंद महास्थावीर यांच्या नेतृत्वात देश विदेशातील ५० पेक्षा जास्त भिक्खुंचे आगमन झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)