शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरटी येथील नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.

किसान क्रांती मोर्चा : आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील गावामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा अन्यथा अंदोलन करण्याचा इशारा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा हळदा, बोळधा, मुडझा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्यामपूर, भूज, आवळगाव, कोसंबी, मुरपार, गायडोंगरे वायगाव व चोरटी परिसरात नरभक्षक वाघामुळे मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७ जुलै ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी या गावात दुपारी सहदेव पांडूरंग तलमले (५०) व नारायण शिवराम कांबळी (३५) यांचेवर वाघाने हल्ला करुन गंभीर जखमी केले. तसेच मागील दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. तर अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनवीले आहे. त्यामुळे नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी व वाघाच्या हल्ल्यातील मृत पावलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी परिसरातील हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते, तसेच वनविभाग कार्यालयावर ठिय्या आंदोलन, मोर्चे, धरणे करुन वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, तसेच वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या चोरटी येथील ग्रामस्थांना आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशार किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर, उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांना तहसीलदार विद्यासागर चव्हान यांच्या मार्फत देण्यात आले.या शिष्टमंडळात विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, नामदेव नखाते, अविनाश राऊत, सुधीर सेलोकर, मोरेश्वर उईके, शुभम पत्रे, नरेंद्र नरड उपस्थित होते.