शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न : ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे. हा ध्यास बाळगून काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मोठ्या शर्थीने तब्बल ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा विकास निधी मंजूर करून घेतला. साडेचार वर्षांत प्रकल्पांची कामे पूर्ण केल्याने या क्षेत्रात दरवर्षी सिंचनाची व्याप्ती वाढ आहेत.ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे. गोसेखुर्दच्या कालव्यांच्या कामांना गती आली आहे. गोसेखुर्दचे पाणी उपसा सिंचनाद्वारे घोडाझरी तलावात सोडण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले. यासोबतच गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणण्यासाठी शासनाला बाध्य केले.नलेश्वर धरणही शेतकऱ्यांना सिंचनासाठी सज्ज झाले आहे. या धरणातील पाणी शेतकºयांच्या बांधांपर्यंत जाण्यासाठी कालव्यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. पुढचा शेतीचा हंगाम करण्यासाठी शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागून नये, यासाठी आमदार वडेट्टीवार यांनी सिंचन प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन कामे मार्गी लावली. याचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत.गराडी नाल्यावर जलसेतूगराडी नाल्यावर जलसेतू दुरुस्तीकरीता ६० लाखांचा निधी वापरण्यात आला. जलसेतूमध्ये ३०० मीटरच्या पूर्वी व नंतर हेडवॉलचे बांधकाम झाले. त्यात एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविले. यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कोटगल प्रकल्पामधून २०० पाईप आणण्यात आले. युद्ध पातळीवर काम करून १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम केल्यामूळेच गोसीखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात येऊ शकले. गराडी नाल्यातील क्षतीग्रस्त जलसेतूच्या ३०० भागाचे अर्थवर्क व सिंमेट लाईनींगसाठी सुमारे १५ कोटी खर्च होणार आहे.शेतीला बारमाही पाणीआसोलामेंढा तलावातील पाणी वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात टाकण्यात येणार असून कापसी व साखरी नहरासह अन्य नहराद्वारे सावली तालूक्यातील ४० हजार हेक्टर शेतीला बारमाही सिंचनाची सोय झाली. शेतकरी परंपरागत एकच पीक न घेता वर्षातून दोन-तीनदा पीक घेऊन परिसरात हरितक्रांती घडविण्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प