शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ब्रह्मपुरी क्षेत्रातील ७३ हजार ७९५ एकर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न : ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे. हा ध्यास बाळगून काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मोठ्या शर्थीने तब्बल ८३१ कोटी ३९ लक्ष १५ हजारांचा विकास निधी मंजूर करून घेतला. साडेचार वर्षांत प्रकल्पांची कामे पूर्ण केल्याने या क्षेत्रात दरवर्षी सिंचनाची व्याप्ती वाढ आहेत.ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तीनही तालुके सुजलाम् सुफलाम् करायचेच हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. यासाठी पाच वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. शासनाकडून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून आसोला मेंढा प्रकल्पासह लघू कालवे, वितरिका, मातीकाम अस्तरीकरण व त्यावरील बांधकाम या महत्त्वपूर्ण कामांसाठी हा निधी खर्च केला जात आहे. गोसेखुर्दच्या कालव्यांच्या कामांना गती आली आहे. गोसेखुर्दचे पाणी उपसा सिंचनाद्वारे घोडाझरी तलावात सोडण्यासाठी त्यांनी शासनाला भाग पाडले. यासोबतच गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणण्यासाठी शासनाला बाध्य केले.नलेश्वर धरणही शेतकऱ्यांना सिंचनासाठी सज्ज झाले आहे. या धरणातील पाणी शेतकºयांच्या बांधांपर्यंत जाण्यासाठी कालव्यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. पुढचा शेतीचा हंगाम करण्यासाठी शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागून नये, यासाठी आमदार वडेट्टीवार यांनी सिंचन प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन कामे मार्गी लावली. याचा लाभ हजारो शेतकरी घेत आहेत.गराडी नाल्यावर जलसेतूगराडी नाल्यावर जलसेतू दुरुस्तीकरीता ६० लाखांचा निधी वापरण्यात आला. जलसेतूमध्ये ३०० मीटरच्या पूर्वी व नंतर हेडवॉलचे बांधकाम झाले. त्यात एक मीटर व्यासाचे ३०० मीटर लांब असलेल्या १२०० मीटरचे चार पाईप लाईन बसविले. यासाठी, गडचिरोली जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कोटगल प्रकल्पामधून २०० पाईप आणण्यात आले. युद्ध पातळीवर काम करून १२०० मीटर पाईप बसविण्याचे काम केल्यामूळेच गोसीखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात येऊ शकले. गराडी नाल्यातील क्षतीग्रस्त जलसेतूच्या ३०० भागाचे अर्थवर्क व सिंमेट लाईनींगसाठी सुमारे १५ कोटी खर्च होणार आहे.शेतीला बारमाही पाणीआसोलामेंढा तलावातील पाणी वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात टाकण्यात येणार असून कापसी व साखरी नहरासह अन्य नहराद्वारे सावली तालूक्यातील ४० हजार हेक्टर शेतीला बारमाही सिंचनाची सोय झाली. शेतकरी परंपरागत एकच पीक न घेता वर्षातून दोन-तीनदा पीक घेऊन परिसरात हरितक्रांती घडविण्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प