शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

परिपत्रकाअभावी मनमानी मोजणी

By admin | Updated: May 27, 2014 00:44 IST

भुमी अभिलेख कार्यालय राजुरामध्ये मोजणी प्रकरणात शासनाने वेळोवेळी नियम व परिपत्रक जारी करून त्यानुसार मोजणी करून पोट हिस्सा पाहण्याचे निर्देश दिले आहे.

राजुरा : भुमी अभिलेख कार्यालय राजुरामध्ये मोजणी प्रकरणात शासनाने वेळोवेळी नियम व परिपत्रक जारी करून त्यानुसार मोजणी करून पोट हिस्सा पाहण्याचे निर्देश दिले आहे. परंतु या कार्यालयात नियम व परिपत्रक उपल्ध नसल्यामुळे मोजणी प्रकरणात मनमानी पद्धतीने मोजणी करून पोट हिस्सा पाडून मोजणी धारकास अडचणीत टाकले जात आहे. राजुरा भुमी अभिलेख कार्यालयातून मौजा लक्कडकोट येथील सर्व्हे नं. ६५ ची मोजणी १२ जानेवारी २००८ ला करण्यात आली. त्यात नकाशा व वहीवाटीचे क्षेत्र तसेच सात-बाराचे क्षेत्र व नकाशाचे क्षेत्र मिळत नसल्यामुळे पोट हिस्सा कायम करता आला नाही. असे जारी केलेल्या ‘क’ आलेख मध्ये नोंद आहे. याची एकत्रीकरण तक्रार अर्जान्वये फेर मोजणी १२ जून २०१२ ला करण्यात आली. त्यात जारी प्रमाणीत प्रत मध्ये नकाशाचे क्षेत्र हे सातबारा व वहीवाटीच्या क्षेत्राशी मिळत नसल्यामुळे प्रकरण दुरूस्तीस पात्र आहे, असे उपअधिक्षक भुमी अभिलेख राजुरा यांनी प्रमाणीत पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच मौजा खिरडी येथील शेत सर्व्हे नं. २२ ची कोर्ट कमीशन प्रकरणात मोजणी ३० आॅक्टोबर २०११ ला शेतमालक व लगतचे शेतकर्‍यांच्या गैरहजेरीत करण्यात आली. त्यात मोजणीमध्ये सातबारा नुसार आराजी व नकाशानुसार आराजीत तफावत असताना सर्व नियम व परिपत्रकास डावलून मनमानी व मर्जीनुसार कार्यालयात बसून दोन पोट हिस्साऐवजी तीन पोट हिस्से पाडून प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे. सदर प्रकरणात माहिती अधिकारान्वये १३ जानेवारी २०१४ ला मोजणीत कार्यवाहीच्या टिप व खुलाशाचे नियम व परिपत्रकाची मागणी करण्यात आली असता त्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे माहिती अधिकार्‍यांनी त्यांचे पत्र क्रमांक ३०२ दि. १० फेब्रुवारी २०१४ च्या पत्राद्वारे विषयांकित परिपत्रक उपलब्ध नसल्यामुळे आपणास पुरविणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी, असे कळविले आहे. त्यामुळे या कार्यालयातून करण्यात येणार्‍या मोजणी प्रकरणात मनमानी आदेश जारी करून जमीन धारकांवर अन्याय व आपसी झगडे लावण्याचा प्रकार सुरू आहे. त्याच्या या आडमुठ्या निर्णयामुळे जमीन धारक त्रस्त झाले आहे. अशा अनेक प्रकरणात जमीनधारकास वरिष्ठ अधिकारी व न्यायालयाचा सहारा घेऊन पायपीट करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी पिडीत शेतकर्‍यांनी संंबधितांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)