शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘अमृत’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:00 IST

अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

३०५ कोटींचा निधी: चंद्रपुरातील पाणी पुरवठा प्रबळ करणारचंद्रपूर : अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून इरई नदीच्या जॉकवेलपासून तर ग्राहकांच्या नळाच्या तोटीपर्यंत दुरुस्ती करुन २०२१ पर्यंत शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. मानगरपालिकेने दिवाळीनिमित्त चंद्रपुरकरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट असून भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.अमृत योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका २५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अमृत योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपये खर्च करुन शहरात सुमारे ५५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. इरई नदी ते चंद्रपूर शहरापर्यतची १७ किलोमीटरची मोठी पाईपलाईनसुद्धा बदलण्यात येणार आहे. १६ पैकी ८ पाण्याच्या टाक्या पाडून ८ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. तसेच तुकूमधील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि दाताळा इरई नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात ७१ कोटी रुपये खर्च करुन धानोरा बॅरेजवरुन चंद्रपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन २०४८ पर्यंतची संभाव्य ५.२६ लाख शहराची लोकसंख्या गृहित धरुन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात समप्रमाणात पाणी वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहराची पहिली पाणीपुरवठा योजना सन १९७६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी शहर आणि शहराची लोकसंख्या लहान होती. त्यामुळे १९८५ पासून इरई धरणातून पाण्याची उचल सुरु आहे. त्यावेळी २.१० लाख लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार ५१ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. मात्र, ४० एमएलडी पाणीच मिळते. त्यापैकी ठिकठिकाणी असलेल्या लिकेजेसमुळे ८ एमएलडी पाण्याची गळती होते.नव्या योजनेमध्ये गळती होणार नसल्याने आठ एमएलही पाणी वाया जाणार नाही. धानोरा बॅरेजमध्ये २६ एमएम क्यूब पाणी शहरासाठी राखीव आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्णत्वास आल्यानंतर धानोरा बॅरेजवरुन आणखी ४० एमएलडी पाण्याची उचल केली जाणार आहे. सध्या शहरातील नळ ग्राहकांची संख्या २७ हजार असून सर्वेक्षणातत निदर्शनास आलेल्या मालमत्तेनुसार भविष्यात जवळपास ७० हजार नळाचे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे. हे सर्व गृहित धारुनच अमृत योजना तयार करण्यात आल्याचे आयुक्त काकडे यांनी सांगितले.दुसरी महत्वाची बाब म्हणजे या योजनेचे काम सुरु करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते फूटणार आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी योजनेमध्ये निधीचा समावेश करण्यात आल्याचेही काकडे यांनी सांगितले.सध्याची पाणीपुरवठा योजना अत्यंत तोकडी आहे. प्रत्येक भागात पाईपलाईन नसल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पाणीपुरवठासंबंधी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र, ही योजना अंमलात आल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलेली ही मोठी भेट असल्याचे काकडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपमहापौर वसंत देशमुख, उपायुक्त डॉ. विजय इंगोले, शहर अभियंता महेश बारई, नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)