शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:00 IST

अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

३०५ कोटींचा निधी: चंद्रपुरातील पाणी पुरवठा प्रबळ करणारचंद्रपूर : अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून इरई नदीच्या जॉकवेलपासून तर ग्राहकांच्या नळाच्या तोटीपर्यंत दुरुस्ती करुन २०२१ पर्यंत शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. मानगरपालिकेने दिवाळीनिमित्त चंद्रपुरकरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट असून भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.अमृत योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका २५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अमृत योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपये खर्च करुन शहरात सुमारे ५५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. इरई नदी ते चंद्रपूर शहरापर्यतची १७ किलोमीटरची मोठी पाईपलाईनसुद्धा बदलण्यात येणार आहे. १६ पैकी ८ पाण्याच्या टाक्या पाडून ८ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. तसेच तुकूमधील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि दाताळा इरई नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात ७१ कोटी रुपये खर्च करुन धानोरा बॅरेजवरुन चंद्रपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन २०४८ पर्यंतची संभाव्य ५.२६ लाख शहराची लोकसंख्या गृहित धरुन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात समप्रमाणात पाणी वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहराची पहिली पाणीपुरवठा योजना सन १९७६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी शहर आणि शहराची लोकसंख्या लहान होती. त्यामुळे १९८५ पासून इरई धरणातून पाण्याची उचल सुरु आहे. त्यावेळी २.१० लाख लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार ५१ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. मात्र, ४० एमएलडी पाणीच मिळते. त्यापैकी ठिकठिकाणी असलेल्या लिकेजेसमुळे ८ एमएलडी पाण्याची गळती होते.नव्या योजनेमध्ये गळती होणार नसल्याने आठ एमएलही पाणी वाया जाणार नाही. धानोरा बॅरेजमध्ये २६ एमएम क्यूब पाणी शहरासाठी राखीव आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्णत्वास आल्यानंतर धानोरा बॅरेजवरुन आणखी ४० एमएलडी पाण्याची उचल केली जाणार आहे. सध्या शहरातील नळ ग्राहकांची संख्या २७ हजार असून सर्वेक्षणातत निदर्शनास आलेल्या मालमत्तेनुसार भविष्यात जवळपास ७० हजार नळाचे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे. हे सर्व गृहित धारुनच अमृत योजना तयार करण्यात आल्याचे आयुक्त काकडे यांनी सांगितले.दुसरी महत्वाची बाब म्हणजे या योजनेचे काम सुरु करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते फूटणार आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी योजनेमध्ये निधीचा समावेश करण्यात आल्याचेही काकडे यांनी सांगितले.सध्याची पाणीपुरवठा योजना अत्यंत तोकडी आहे. प्रत्येक भागात पाईपलाईन नसल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पाणीपुरवठासंबंधी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र, ही योजना अंमलात आल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलेली ही मोठी भेट असल्याचे काकडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपमहापौर वसंत देशमुख, उपायुक्त डॉ. विजय इंगोले, शहर अभियंता महेश बारई, नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)