शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

‘अमृत’च्या विकास आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 01:00 IST

अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे.

३०५ कोटींचा निधी: चंद्रपुरातील पाणी पुरवठा प्रबळ करणारचंद्रपूर : अमृत योजनेच्या सुमारे ३०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या योजनेतून इरई नदीच्या जॉकवेलपासून तर ग्राहकांच्या नळाच्या तोटीपर्यंत दुरुस्ती करुन २०२१ पर्यंत शहरातील प्रत्येक नागरिकाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करता येणार आहे. मानगरपालिकेने दिवाळीनिमित्त चंद्रपुरकरांना दिलेली ही सर्वात मोठी भेट असून भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असा विश्वास महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.अमृत योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महानगरपालिका २५ टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अमृत योजनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २३४ कोटी रुपये खर्च करुन शहरात सुमारे ५५३ किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. इरई नदी ते चंद्रपूर शहरापर्यतची १७ किलोमीटरची मोठी पाईपलाईनसुद्धा बदलण्यात येणार आहे. १६ पैकी ८ पाण्याच्या टाक्या पाडून ८ नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहे. तसेच तुकूमधील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती आणि दाताळा इरई नदीवरील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम २४ महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात ७१ कोटी रुपये खर्च करुन धानोरा बॅरेजवरुन चंद्रपूर शहरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सन २०४८ पर्यंतची संभाव्य ५.२६ लाख शहराची लोकसंख्या गृहित धरुन ही पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शहराच्या प्रत्येक भागात समप्रमाणात पाणी वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर शहराची पहिली पाणीपुरवठा योजना सन १९७६ मध्ये सुरू करण्यात आली. त्यावेळी शहर आणि शहराची लोकसंख्या लहान होती. त्यामुळे १९८५ पासून इरई धरणातून पाण्याची उचल सुरु आहे. त्यावेळी २.१० लाख लोकसंख्येसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार ५१ एमएलडी पाणी अपेक्षित आहे. मात्र, ४० एमएलडी पाणीच मिळते. त्यापैकी ठिकठिकाणी असलेल्या लिकेजेसमुळे ८ एमएलडी पाण्याची गळती होते.नव्या योजनेमध्ये गळती होणार नसल्याने आठ एमएलही पाणी वाया जाणार नाही. धानोरा बॅरेजमध्ये २६ एमएम क्यूब पाणी शहरासाठी राखीव आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजना पूर्णत्वास आल्यानंतर धानोरा बॅरेजवरुन आणखी ४० एमएलडी पाण्याची उचल केली जाणार आहे. सध्या शहरातील नळ ग्राहकांची संख्या २७ हजार असून सर्वेक्षणातत निदर्शनास आलेल्या मालमत्तेनुसार भविष्यात जवळपास ७० हजार नळाचे ग्राहक होतील, अशी अपेक्षा आहे. हे सर्व गृहित धारुनच अमृत योजना तयार करण्यात आल्याचे आयुक्त काकडे यांनी सांगितले.दुसरी महत्वाची बाब म्हणजे या योजनेचे काम सुरु करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते फूटणार आहेत. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासाठी योजनेमध्ये निधीचा समावेश करण्यात आल्याचेही काकडे यांनी सांगितले.सध्याची पाणीपुरवठा योजना अत्यंत तोकडी आहे. प्रत्येक भागात पाईपलाईन नसल्याने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे पाणीपुरवठासंबंधी नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मात्र, ही योजना अंमलात आल्यानंतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे चंद्रपूरकरांसाठी महानगरपालिका प्रशासनाने दिलेली ही मोठी भेट असल्याचे काकडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला उपमहापौर वसंत देशमुख, उपायुक्त डॉ. विजय इंगोले, शहर अभियंता महेश बारई, नगरसेवक संदीप आवारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)