शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

चिमूर नगर परिषदेला मंजुरी

By admin | Updated: March 13, 2015 01:04 IST

चिमूर क्रांतीभूमित नगर परिषद निर्मितीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर नगर ...

चिमूर: चिमूर क्रांतीभूमित नगर परिषद निर्मितीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानंतर नगर विकास विभागाने पत्राद्वारे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चिमूर येथे नगर परिषद स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्याची माहिती देऊन पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या गेल्या पंधरा - वीस वर्षापासून रखडलेल्या मागणीची पूर्तता होत असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सातत्याने पाठपुरावा केला.चिमूर येथे मागील दोन वर्षांपासून तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहिद स्मृतीदिन सोहळ्यात चिमूर व नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षांपासून या घोषणेची कुठलीही अंमलबजावणी न होता, या दोन्ही शहरात राज्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणा प्रमाणे नगरपंचायतीची उद्घोषण काढण्यात आल्या होती. मात्र चिमूर येथे नगरपरिषदच हवी, हा गावकऱ्यांचा व स्थानिक राजकीय नेत्यांचा आग्रह होता.मध्यंतरी राज्यात विधानसभेच्या निवडणूका घेवून सत्तांतर झाले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर चिमूर व नागभीड नगर परिषदेच्या निर्मितीसाठी चिमूरचे आ. किर्तीकुमार भांगडिया हे गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. नगर परिषद निर्मितीसाठी लागणारी कागदपत्रे, प्रस्ताव व तसेच या नगर परिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांची सहमती मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात आले. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या काळात चिमूर नगरपरिषदेच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर नगर विकास विभागाने तात्काळ १६ मार्चला चिमूर येथे नगर परिषद स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावावर शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. (शहर प्रतिनिधी)