शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात योजनेच्या १२ दाव्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:32 IST

या योजनेसाठी येथील तालुका कृषी कार्यालयाकडे २०१९-२० या वर्षात १८ शेतकऱ्यांच्या वारसांनी दावे दाखल केले होते. ही अपघात विमा ...

या योजनेसाठी येथील तालुका कृषी कार्यालयाकडे २०१९-२० या वर्षात १८ शेतकऱ्यांच्या वारसांनी दावे दाखल केले होते. ही अपघात विमा योजना २०१५-१६ पासून सुरू करण्यात आली आहे. सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, रस्ते अपघात, विषबाधा, झाडावरून पडल्याने मृत्यू ओढवणे आणि वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्यांना या अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. कायम अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांच्या मदतीचे या योजनेत प्रावधान आहे. असे असले तरी पुरेशा माहितीअभावी किंवा काही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहत असल्याचे यासंदर्भात बोलले जात आहे.

जे शेतकरी अपघातात मयत झाले, त्या शेतकऱ्यांच्या वारसदारांकडून कृषी कार्यालयाकडे दावे सादर करण्यात आल्यानंतर हे दावे संबंधित विमा कंपनीकडे पाठविले जातात. या विमा कंपनीने या दाव्यांना मंजुरी दिल्यानंतर सानुग्रहाची ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येते. सादर करण्यात आलेल्या दाव्यांपैकी काही दावे नामंजूरही करण्यात येतात. २०१९-२० या वर्षात १८ शेतकऱ्यांचे दावे नागभीड येथील तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाले. या १८ दाव्यांपैकी १२ दाव्यांना मंजुरी मिळाली आहे. चार दाव्यांवर कार्यवाही सुरू असून दोन दावे नामंजूर करण्यात आल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळणे बाकी आहे, त्यांना लाभ मिळावा म्हणून कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. तो शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील नसणे, जमिनीच्या सातबारावर नाव नसणे आणि अपघातामध्ये गाडी चालविण्याचा परवाना नसणे या मुख्य बाबी योजनेचा लाभ मिळण्यात अडसर ठरत असल्याची माहिती आहे. मात्र आता योजनेच्या नियमांमध्ये बरीच सुधारणा करण्यात आल्याची माहिती आहे.

बॉक्स

२०२०-२१ साठी सहा प्रकरणे

२०२०-२१ हे आर्थिक वर्ष सुरू होऊन सात महिने झाले आहेत. असे असले तरी या अपघात विमा योजनेसाठी आतापर्यंत सहा प्रकरणे नागभीड तालुका कृषी कार्यालयास प्राप्त झाली आहेत.