शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

चंद्रपूर आणि बल्लारपुरात भूमिगत विद्युत केबल टाका

By admin | Updated: October 15, 2015 01:20 IST

चंद्रपूर आणि बल्लारपूर या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याची मागणी वित्तमंत्री .

सुधीर मुनगंटीवार यांची मागणी : तातडीने कार्यवाही करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देशचंद्रपूर : चंद्रपूर आणि बल्लारपूर या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याची मागणी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या दोन्ही शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.१२ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ना.सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन्ही शहरे औद्योगिक दृष्टया महत्वपूर्ण आहेत. या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित केल्यास या समस्येवर प्रभावी उपाययोजना होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. या दोन्ही शहरांमध्ये भूमिगत केबल व्यवस्था स्थापित करण्यात येईल, असे सांगत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तीन महिन्यात विशेष अभियान राबवून अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यांचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (स्थानिक प्रतिनिधी)ऊर्जानगर वसाहतीचे नूतनीकरण कराचंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर येथील वसाहतीतील इमारतींचे नूतनीकरण करावे. तसेच वसाहतीत आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात येत्या तीन महिन्यात १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिले. सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. आशिया खंडातील वीज निर्मितीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची ऊर्जानगर येथील वसाहत फार जुनी वसाहत आहे. या वसाहतीतील इमारतींचे नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. वसाहतीतील रस्त्यांची दुरुस्ती, व्यायामशाळेची निर्मिती, उद्यानाची निर्मिती, क्रीडा संकुलाची निर्मिती, उत्तम बाजारपेठेची निर्मिती आदी सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने तीन वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखावा व त्यासाठी खासगी आर्किटेक्ट नेमून याबाबतचा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत त्वरित१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंता बुरडे यांना दिले.