शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

स्वामीनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: January 24, 2016 00:54 IST

कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या पूर्वीच सादर झालेला आणि गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित ठेवलेला स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे.

कष्टकरी जनआंदोलनाची मागणी : अन्यायाविरुद्ध संघटित होण्याची तयारीचिमूर : कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या पूर्वीच सादर झालेला आणि गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित ठेवलेला स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. हा अहवाल लागू करण्यास सत्ताधारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. या अन्यायाविरुद्ध संघटित होऊन प्रतिकार केल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे आता शेतकरी, शेतमजुरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांनी केले.स्वामीनाथन आयोगाने या संदर्भात सांगताना सुरेश डांगे पुढे म्हणाले, विडंबना अशी की अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सादर झालेला स्वामीनाथन आयोगाचा अहवाल मात्र सरकारने मागील नऊ वर्षांपासून दडपून ठेवला आहे. स्वामीनाथन आयोगाने सादर केलेल्या अहवालातील काही महत्त्वाच्या उपायामध्ये शेतकऱ्यांचे खर्च वजा जाता उत्पन्न सरकारी नोकरांच्या बरोबरीने असावे, शेतमालाला हमी भाव त्याच्या उत्पादनात खर्चापेक्षा कमीत कमी ५० टक्के जास्त असावा, शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याच्या पद्धतीत सुधारणा व्हावी, गहू आणि धानाव्यतिरिक्त इतर पिकांनाही आधारभूत किंमत अशी व्यवस्था करावी, किमतीमधील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून मूल्य स्थिरता निधी निर्माण करण्यात यावा, आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणामापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतमालावर आयात कर लावण्याच्या दृष्टीने त्वरित पावले उचलण्यात यावी, एकापाठोपाठ येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी आपत्काल निधी स्थापन करण्यात यावा, खऱ्या गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी पत पुरवठा प्रणालीचा विस्तार करावा, पीक कर्जावरील व्याजाचा दर चार टक्क्यांपर्यंत कमी करावा, हलाखीची स्थिती असलेल्या क्षेत्रामध्ये तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत सर्व कर्जाची वसुली स्थगित करावी आदींचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)अशी आहे आयोगाची शिफारसभारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे माजी संचालक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना केली. आयोगाने डिसेंबर २००४, आॅगस्ट २००५, डिसेंबर २००५ आणि एप्रिल २००६ मध्ये सरकारला चार अहवाल सादर केले. पाचवा आणि शेवटचा अहवाल आयोगाने ४ आॅक्टोबर २००६ रोजी सादर केला. या अहवालामध्ये आयोगाने भारतीय शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची विविध कारणे नमूद केली आणि ही अवस्था सुधारण्यासाठी विस्तृत उपाययोजना सुचविली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ आॅक्टोबर २००६ रोजी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सहाव्या वेतन आयोग लागू करण्याची सरकारने घोषणा केली. त्यापुढची पायरी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसताना अडीच वर्षे आधीच सातवा वेतन आयोग जाहीर करुन त्यांच्या पगारात किमान ५० टक्क्यांनी पुन्हा वाढ करण्याचा घाट सरकारने घातला आहे.