शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

सिंचन विहिरींचा लाभ घेण्याचे आवाहन

By admin | Updated: October 28, 2016 00:51 IST

अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.

चंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. त्यावर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शासनाने यावर्षी सिंचन विहिरीचे लक्ष्यांक दिला आहे. या सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत २०१५ मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. शाश्वत सिंचनाची व तत्सम इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००० कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, नागपूर येथे विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या. या बैठकाच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा ४ एप्रिल २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आहे. त्यावेळी नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात भूगर्भात उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त विहिरी घेण्यात याव्यात, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्याला अनुसरून जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीसाठी निधी योजनेतर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.विहिरी तयार करण्यासाठी असलेली तरतुद विचारात घेऊन नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० विहिरी, भंडाऱ्यात १ हजार विहिरी, चंद्रपूर जिल्ह्यात ३ हजार विहिरी, नागपूर जिल्ह्यात ५०० विहिरी व गोंदिया २ हजार विहिरी अशाप्रकारे पाच जिल्ह्यांसाठी एकूण ११ हजार विहिरीचा लक्षांक देण्याची बाब शासनाचे विचाराधिन होती. त्यास अनुसरून शासनाने निर्णय घेतला आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)