शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींचा लाभ घेण्याचे आवाहन

By admin | Updated: October 28, 2016 00:51 IST

अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.

चंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. त्यावर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शासनाने यावर्षी सिंचन विहिरीचे लक्ष्यांक दिला आहे. या सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत २०१५ मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. शाश्वत सिंचनाची व तत्सम इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००० कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, नागपूर येथे विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या. या बैठकाच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा ४ एप्रिल २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आहे. त्यावेळी नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात भूगर्भात उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त विहिरी घेण्यात याव्यात, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्याला अनुसरून जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीसाठी निधी योजनेतर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.विहिरी तयार करण्यासाठी असलेली तरतुद विचारात घेऊन नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० विहिरी, भंडाऱ्यात १ हजार विहिरी, चंद्रपूर जिल्ह्यात ३ हजार विहिरी, नागपूर जिल्ह्यात ५०० विहिरी व गोंदिया २ हजार विहिरी अशाप्रकारे पाच जिल्ह्यांसाठी एकूण ११ हजार विहिरीचा लक्षांक देण्याची बाब शासनाचे विचाराधिन होती. त्यास अनुसरून शासनाने निर्णय घेतला आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)