शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

सिंचन विहिरींचा लाभ घेण्याचे आवाहन

By admin | Updated: October 28, 2016 00:51 IST

अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.

चंद्रपूर : अपुऱ्या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. त्यावर शाश्वत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शासनाने यावर्षी सिंचन विहिरीचे लक्ष्यांक दिला आहे. या सिंचन विहिरीचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केले आहे.मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत २०१५ मध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली. शाश्वत सिंचनाची व तत्सम इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००० कोटी रुपये तरतुद करण्यात आली आहे. २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, नागपूर येथे विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या. या बैठकाच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीबाबतचा आढावा ४ एप्रिल २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आहे. त्यावेळी नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात भूगर्भात उपलब्ध पाण्याची पातळी विचारात घेता शेततळी घेण्यापेक्षा जास्तीत जास्त विहिरी घेण्यात याव्यात, असे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्याला अनुसरून जिल्ह्यामध्ये सिंचन विहिरीसाठी निधी योजनेतर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.विहिरी तयार करण्यासाठी असलेली तरतुद विचारात घेऊन नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० विहिरी, भंडाऱ्यात १ हजार विहिरी, चंद्रपूर जिल्ह्यात ३ हजार विहिरी, नागपूर जिल्ह्यात ५०० विहिरी व गोंदिया २ हजार विहिरी अशाप्रकारे पाच जिल्ह्यांसाठी एकूण ११ हजार विहिरीचा लक्षांक देण्याची बाब शासनाचे विचाराधिन होती. त्यास अनुसरून शासनाने निर्णय घेतला आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)