शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

ठळक मुद्देअडकलेल्या मजुरांचा सवाल : मजूर म्हणतात’ घरी आलोत परंतु कोंडमारा भोगतोय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाची खडगी भरण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेलेले जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार स्थलांतरीत मजूर सोमवारपर्यंत परत आले आणि क्वारंटाईन झाले. मात्र, झोपडीवजा घरात कसे व किती अंतर ठेवणार, मजुरीची तर काहीच शाश्वती नाही, संकटे झेलत घरी येऊनही कोंडमारा भोगत आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून चंद्रपुरात अडकलेले परप्रांतीय मजूर प्रशासनाला विचारत आहेत ‘घरचे सर्व चिंतेत आहेत परतीसाठी आमचा नंबर केव्हा लावणार...’ सरकारने मजुरांना रेल्वेने पाठविणे सुरू केले. पण सारेच मजूर अस्वस्थ आहेत. ‘लोकमत’ने विविध ठिकाणच्या निवारा केंद्रांची पाहणी केल्यानंतर कुटुंबाचीच चिंताच मजुरांना छेडत असल्याचे तणावग्रस्त चेहऱ्यावरून बुधवारी दिसून आले.धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे. घरी परतलेले मजूर आता क्वारंटाईनमध्ये आहेत. मूल येथील होम क्वारंटाईनमधील व्यक्तींच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता म्हणाले, चंद्रमोळी तीन खोल्यांच्या झोपडीत सात सदस्य राहतात. काम केले तरच पोट भरते. घरात पैसाअडका नाही. ‘आरोग्य की पोट’ याबाबत कशाचे अंतर पाळायचे हेच समजत नाही.’ नागभीड तालुक्यातील विंथूर, ठवरे पारडी, पाणलोडी, नांदेड येथील मजुरांनाही रोजीरोटीचाच प्रश्न भेडसावत आहे.मदतीऐवजी घराचीच ओढचंद्रपूर शहराच्या महाकाली वार्डातील मनपाच्या महाकाली कन्या स्कूल विद्यालयातील निवारा केंद्रात मध्य प्रदेशातील २३ व भंडारा जिल्ह्यातील एक असे एकूण २४ मजूर अडकले आहेत. इमारती बांधकामावर काम करणारे हे मजूर घरी जाण्याची प्रतीक्षा करत आहेत. याशिवाय घुटकाळा वार्डातील जाकीर हुसेन उर्दू विद्यालयात तेलंगणाचे १६ व गोंदियाचे ७ असे २३ मजूर अडकून आहेत. या केंद्रांना भेटी दिल्या असता मनपा व जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले. मदतीऐवजी घराकडे कधी पोहोचवणार, याचीच सर्वांना आतुरता लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.क्वारंटाईन पूर्ण झालेल्यांना प्रमाणपत्राची प्रतीक्षालॉकडाऊन कालावधीत बाहेरून आलेल्या व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार क्वारंटाईन झाले. अनेकांचा क्वारंटाईन पूर्ण झाला. पण, अद्याप प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना घरातच अडकून राहावे लागत आहे.सुविधा पुरविण्यास दमछाकजिवती : परप्रांतात गेलेल्या तालुक्यातील मजुरांच्या परतीचा ओघ सुरूच असल्याने सुविधा पुरविण्यास प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे घरीच विलगीकरण करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी ग्रामपंचायतींना दिले. तालुक्यातून १ हजार ९०० मजूर ऊस, मिरची तोडणी व कापूस वेचणीकरिता परराज्यात गेले होते. उन्हाची तीव्रता वाढली. सर्वांना सोयी-सुविधा पुरविणेही कठिण होत आहे. गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्यास ग्रामपंचायत दोन हजारांचा दंड ठोठावणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या