शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

भद्रावतीच्या महिला बचत गटाला राष्ट्रीय उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 11:48 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या हस्ते गौरव होणारचंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

सचिन सरपटवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय स्वच्छता अभियानातंर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाचा राष्ट्रीय उत्कृष्ठ स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ मार्च रोजी केंद्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. केंद्रीय नगर विकासमंत्री याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ठ स्वच्छता पुरस्काराचा दावेदार हा बचत गट असण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, दारिद्र्य रेषेखालील या महिला बचत गटातील ११ ही सदस्यांना नगराध्यक्ष अनिल धानोरकर दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यासाठी विमानाने घेवून जाणार आहेत. महिलांच्या जीवनातील हा एक आगळावेगळाच प्रसंग असणार आहे. डायनॅमिक रँकीगमधील लोकसहभागाच्या स्पर्धेत भद्रावती पालिकेने देशपातळीवर सर्वोच्च स्थान पटकाविले होते. आता बचत गटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने भद्रावती पालिकेच्या रुपाने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.पुरस्कारासाठी भद्रावती पालिकेद्वारे पाच नोंदणीकृत महिला बचत गटांची शिफारस करण्यात आली होती. शिफारस केलेल्या या वस्तीस्तर गटांना धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे गरजेचे होते. ही प्रक्रिया पूर्ण करून पाच गट पात्र ठरले. त्यानंतर राज्य शासनाने उन्नती महिला बचत गटाची केंद्र शासनाकडे शिफारस केली. केंद्र शासनाच्या चमुने प्रत्यक्ष पाहणी करून या गटाची पुरस्कारासाठी निवड केली.देशातील २९ राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांमधून महाराष्ट्रातील भद्रावती, उदगिर, हिंगोली व वर्धा नगर परिषद तसेच अकोला, मालेगाव, वसई या महानगरपालिकांची या पुरस्कारासाठी निवड झाली. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी कार्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या बचत गटांना दिल्ली येथे स्वत: विमानाने घेवून जाण्याचे अभिवचन सप्टेंबर २०१७ च्या महिला मेळाव्यात दिले होते. त्याचीच वचनपूर्ती म्हणून या बचत गटाला २९ मार्चला विमानाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला घेवून जाणार आहेत.राज्याच्या संस्कृतीचे दर्शन व्हावे, यासाठी बचत गटाच्या सर्व महिला नववारी पातळ परिधान करून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा बचत गट दारिद्र्य रेषेखालील महिलांचा असून मजुरी करून उपजिविका करणाऱ्या या महिला आहेत. स्वत:ची मजुरी बुडवून शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. या महिलांनी स्वयंप्रेरणेने लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केला. आपला वॉर्ड स्वच्छ केला. विविध उपक्रम राबविले. यामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.यामध्ये मानसी देव, छबू कपाट, रेखा वाणी, सुनीता साव, रेखा भेले, नंदा रामटेके, रंजना मुळक, रेहाना शेख यांचा समावेश असून ज्योती लालसरे, सुरेखा आस्वले, रफीक शेख हे अभियान व्यवस्थापक आहेत.स्वप्न साकार झालेगेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वच्छतेबाबत काम करीत आहोत. त्यानंतर स्वच्छता मोहीमेत ससभागी झालो. वॉर्डातील लोकांनीही आम्हाला मदत केली. एकत्रित काम करण्याचे काय फळ असते ते आज आम्हाला कळले. नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्काराबाबत उत्सुकता वाढली आहे. आयुष्यात विमानवारी पूर्ण होत आहे. नगराध्यक्ष आम्हाला विमानाने दिल्लीत नेणार आहे. आयुष्यात विमानात बसण्याचे स्वप्न ही कधी पाहीले नव्हते.- मानसी देव, अध्यक्ष, उन्नती बचत गट, भद्रावती.- रेहाना शेख, सचिव, उन्नती बचत गट, भद्रावती.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास