शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:30 IST

सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देगॅस, रॉकेलची दरवाढ मागे घ्या : काँग्रेसतर्फे पेट्रोलियम मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे. सत्ता स्थापनेच्या तीन वर्षांच्या निमित्ताने सरकारने थेट अनुदानित स्वयंपाक गॅसचे ७ रूपये व विनाअनुदानित गॅसमध्ये ७४ रूपये तसेच रॉकेलचे दर वाढवून भाजप सरकारने भांडवलदारांना दिलेली वचनपुर्ती पूर्ण केली आहे. मात्र यात सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. त्यामुळे कुठे गेले अच्छे दिन, असा प्रश्न करीत चंद्रपूर शहर काँग्रेसचे सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन रॉकेलची दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चा करून मागण्यांचे निवेदन केंद्र शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना जिल्हाधिकाºयांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या दरवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारा अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर व रॉकेलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आतापर्यंत आठव्यांदा करण्यात आली आहे. वारंवार होणारी दरवाढ सामान्य गोरगरीब जनतेला परवडणारी नाही. भाववाढ केल्यामुळे गरीब जनतेला मिळणारी सबसिडी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच या भाववाढीमुळे केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे स्वयंपाकाची गॅस व रॉकेलचे दर कमी करून भाजपने निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलेले आश्वासन पाळावे व वाढविले दर तत्काळ मागे घ्यावे, असे निवेदन चंद्रपूर विधानसभा काँग्रेस क्षेत्रातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, रोशन रामटेके, कार्याध्यक्ष नागेश बोंडे, अरविंद मडावी, सी. रेमण्डस, जीवन दुधकोहर आदींचा समावेश होता. दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारनेही कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना रांगेत उभे केले आहे. त्यामुळे भाजप सरकार भांडवलदारांचे की शेतकºयांचे असा प्रश्न काँग्रेस पदाधिकाºयांनी केला आहे.