शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकारच्या अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:30 IST

सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देगॅस, रॉकेलची दरवाढ मागे घ्या : काँग्रेसतर्फे पेट्रोलियम मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे. सत्ता स्थापनेच्या तीन वर्षांच्या निमित्ताने सरकारने थेट अनुदानित स्वयंपाक गॅसचे ७ रूपये व विनाअनुदानित गॅसमध्ये ७४ रूपये तसेच रॉकेलचे दर वाढवून भाजप सरकारने भांडवलदारांना दिलेली वचनपुर्ती पूर्ण केली आहे. मात्र यात सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. त्यामुळे कुठे गेले अच्छे दिन, असा प्रश्न करीत चंद्रपूर शहर काँग्रेसचे सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन रॉकेलची दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे.यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चा करून मागण्यांचे निवेदन केंद्र शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना जिल्हाधिकाºयांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या दरवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारा अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर व रॉकेलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आतापर्यंत आठव्यांदा करण्यात आली आहे. वारंवार होणारी दरवाढ सामान्य गोरगरीब जनतेला परवडणारी नाही. भाववाढ केल्यामुळे गरीब जनतेला मिळणारी सबसिडी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच या भाववाढीमुळे केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे स्वयंपाकाची गॅस व रॉकेलचे दर कमी करून भाजपने निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलेले आश्वासन पाळावे व वाढविले दर तत्काळ मागे घ्यावे, असे निवेदन चंद्रपूर विधानसभा काँग्रेस क्षेत्रातर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, रोशन रामटेके, कार्याध्यक्ष नागेश बोंडे, अरविंद मडावी, सी. रेमण्डस, जीवन दुधकोहर आदींचा समावेश होता. दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारनेही कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना रांगेत उभे केले आहे. त्यामुळे भाजप सरकार भांडवलदारांचे की शेतकºयांचे असा प्रश्न काँग्रेस पदाधिकाºयांनी केला आहे.