शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

औद्योगिक शहर गडचांदूरला तालुका घोषित करा

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही तालुका घोषित न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आता या मागणीसाठी नागरिक विधानसभेवर धडकणार आहे.राजुरा, कोरपना, जिवती या तीन तालुक्याचे केंद्रस्थळ व मोठी बाजारपेठ गडचांदूर येथे आहे. गडचांदूरला तहसीलचा दर्जा देवून प्रशासकीय कार्यालय सुरू करावे व इतर मागणीसाठी २१ डिसेंबर २०११ , २१ डिसेंबर २०१२ व १८ डिसेंबर २०१३ ला तालुका संघर्ष समितीतर्फे नागपूर अधिवेशनप्रसंगी मोर्चा काढला होता. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता विधानसभेवर हिवाळी अधिवेशनप्रसंगी १९ डिसेंबरला मोर्चा तसेच धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराला नुकताच नगर परिषदेचा दर्जा शासनाने दिला आहे. राजुरा- कोरपना- जिवती या तिन्ही तालुक्यापासून गडचांदूर शहर २५ किमी अंतरावर आहे. गडचांदूर हे मुख्य केंद्र व मोठी बाजारपेठ तसेच औद्योगिक दृष्टया गजबलेले शहर असल्याने शासनाला येथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परिसरातून शासनाला प्रत्येक वर्षी सुमारे ५० कोटींचा महसूल मिळत असल्याची माहिती आहे.गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत २४ ग्रामपंचायत असून ५२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावातील नागरिकांना गडचांदूर हे शहर सोयीचे आहे. येथे सार्वजनिक बांधकाम विभागचे उपविभागीय कार्यालय विश्रामगृह, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय, नगर परिषद, पोलीस स्टेशन, ग्राम न्यायालय नायब तहसीलदाराचे अस्थायी भेट कार्यालय असे अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित आहे . याशिवाय शाळा, महाविद्यालये, वसतिगृह आहे. परंतु शासनाने या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. जिवती तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर केले आहे. छोट्या खोलीत कार्यालय सुरू आहे. राजुरा येथील दुय्यम निबंधकाकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गडचांदूर येथे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालय गडचांदूर येथे सुरू करण्याची मागणी होत असतानाही कार्यालय सुरू केले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)