शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

कर्जमाफीचे आकडे जाहीर करा

By admin | Updated: June 28, 2017 00:48 IST

मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याचा गाजावाजा करतानाच याचा थेट फायदा ४० लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले.

विजय वडेट्टीवार : कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्र्यांनी ३४ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ केल्याचा गाजावाजा करतानाच याचा थेट फायदा ४० लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले. हा आकडा आला कोठून, असा थेट सवाल करीत ही आकडेवारी राज्य शासनाने जिल्हानिहाय जाहिर केल्यास शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झाल्याचे निष्पन्न होईल, असा आरोप आ. विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.ज्यांच्याकडे ३० जून २०१६ पूर्वीचे कर्ज थकित होते. असेच शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे. ३० जून २०१७ पर्यंत ५० ते ६० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे. येथेच शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झालेली आहे. ३० जून २०१७ पर्यंत थकित असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली असती तर सर्वच शेतकऱ्यांचा याचा फायदा झाला असता याकडेही आ. वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.६० टक्के शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नवीन कर्ज घेतले आहे. कर्जमाफीतून शासनाने बाजार समितीतील संचालक, पं.स. सदस्य, १५ हजार पेन्शन घेणारे, तसेच ४ लाख उत्पन्न घेतात, आयकर भरणारे, अशा शेतकऱ्यांना वगळले आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आई-वडिल असतील त्यांचाच यात समावेश केलेला आहे. ज्यांनी कर्जाची परतफेड केली त्यांना जास्तीत जास्त २५ हजार रुपयांचाच फायदा होणार आहे. दीड लाख रुपयांचे कर्जमाफ म्हणजेही शुद्ध फसवणूक आहे. ज्या शेतकऱ्याकडे तीन लाख रुपये कर्ज आहे. त्यांना ही माफी घ्यावयासाठी आधी उर्वरित दीड लाख रुपये जमा करायचे आहे. त्यानंतर ही कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांकडे दीड लाख असते तर त्यांनी ते पहिलेच भरले असते. दीड लाखांची कर्जमाफीही पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे, मग ही कर्जमाफी ऐतिहासिक कशी, असा सवालही उपस्थित केला. केवळ ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन उर्वरित ५० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का करणार नाही, याकडे लक्ष वेधून आ. वडेट्टीवार म्हणाले, एकूणच कर्जमाफीचा आढावा घेतला तर ही कर्जमाफी आठ ते १० कोटींच्या वर जात नाही. २०१६ ची अट घातल्याने कर्जवाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११७६ कोटींपैकी केवळ ४१६ कोटी, चवथ्या क्रमांकाचे कर्ज वाटप करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४४ कोटींपैकी ३२४ कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा केवळ २२ टक्के आहे. त्यांची वसुली मात्र ८० टक्केवर आहे. ही कर्जमाफी हास्यास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाची ही कर्जमाफी फसवी नसेल, तर कर्जमाफीचे आकडे जिल्हानिहाय जाहीर करावे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना फायदा होणार. ३० जून २०१७ पर्यंतची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही यावेळी आ. वडेट्टीवार यांनी केली. या कर्जमाफीच्या विरोधात शेतकऱ्यांची सुकाणू समिती ९ जुलैपासून रस्त्यावर उतरणार आहे. काँग्रेसचा पूर्ण पाठींबा असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महेश मेंढे, दिनेश चोखारे,घनश्याम मुलचंदानी, शिवा राव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.