शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: August 26, 2015 00:49 IST

तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,...

आरमोरी : तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,अशी मागणी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.संपूर्ण जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात यावर्षी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धानाची रोवणी करणे शक्य झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशाही शेतकऱ्यांचे धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरी अजूनपर्यंत जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी आरमोरीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार, वसंत गेडाम, मनीषा दोनाडकर, दिलीप घोडाम, अशोक वलादे, अनिल भोयर, टीमराव मडावी, भाऊराव भोयर, लक्ष्मण जांभुळकर, चरणदास जांभुळकर, नानाजी जांभुळकर, बाबुराव जांभुळकर, रामचंद्र जांभुळकर, तानुजी सयाम, नाजुकराव सेलोटे, शिवराम आत्राम, डोमाजी वाघमारे, केवलराम ढालणे, प्रेमदास मनारे, काशिनाथ गेडाम, सोनाली दानी आदी उपस्थित होते.शासनाने आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर कराव्या, अन्यथा तालुका काँगे्रसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)