शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे रस्त्यावर लढणारे योद्धे होते

By admin | Updated: September 6, 2016 00:44 IST

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका.

संजय धोटे : जयंती समारोह व नवोदित कवी संमेलनगडचांदूर : अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका. त्यानी १८४२ च्या स्वातंत्र्य लढा, चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो वा गोवा मुक्ती लढ्याचे आंदोलन असो. त्यात त्यांनी शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांच्या जोडीेने या लढ्याला फार मोठे योगदान दिले. म्हणून अशा देशभक्त नेत्याची जयंती सर्वांनी मिळून साजरी केली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले. ते गडचांदूर येथील स्व. भाऊराव पा. चटप आश्रम शाळेच्या स्वामी समर्थ सभागृहातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया तालुका कोरपना व भीमसेना बहुउद्देशिय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह व नवोदित कवी संमेलनाच्या विचारपिठावरुन बोलत होते.कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं (आ.) चे जिल्हा महासचिव सिद्धार्थ पथाडे होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, अण्णाभाऊ साठेच हे खऱ्या अर्थाने वास्तववादी साहित्यिक होते. त्यांनी जीवनात बकाल आणि कंगाल वस्तीत पाहिले, भोगले व अनुभवले, तेच त्यांनी आपल्या साहित्यात मांडले. त्यांच्यासाठी ते आयुष्यभर लढले आणि लिहित राहिले. माजी प्राचार्य जी.एस. कांबळेनी अण्णाभाऊ हे पहिलेभलेही साम्यवादी चळवळीकडे झुकले होते. परंतु नंतर आंबेडकरी विचारधारेशिवाय गतंत्यर नाही,असे कळून चुकल्यानेच त्यांच्या साहित्याचा व चळवळीचा कल आंबेडकरी चळवळीकडे वळले. प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी श्रमिकांची व दलदलीमध्ये फसलेल्यांच्या घामाची महती गाणारा व त्यांनाच आपल्या साहित्याचा नायक बनवून त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारा खरा साहित्यसम्राट व लोकनेता होता, असे म्हणाले. तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर, गडचांदूरचे माजी सरपंच रहुफभाई, तुळशीराम भोजेकर, रोहण काकडे, भीमरव कंचकटले, तुकाराम जाधव, ईश्वर देवगडे, किशोर रायपुरे, सुर्यकांत कांबळे यांचे यथोचित भाषणे झालीत.यावेळी प्रसिद्ध कवी रत्नाकर चटप यांच्या अध्यक्षतेखाली व कवी रमेश घुमे यांच्या संचालनात नवोदित कवींचे संमेलन झाले. त्यात ११ कवींनी कविता सादर केला. त्याचा आयोजकांकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रिपाइंचे तालुका अध्यक्ष अशोककुमार उमरे यांनी, संचालन शाहीर यशवंत गायकवाड यांनी आणि आभार प्रदर्शन गौतम भसारकर यांनी केले. कार्यक्रमासाठी रिपाइं (आ.) चे तालुका महासचिव प्रभाकर खाडे, राहुल उमरे, विक्की मूल, विठ्ठल पोतराजे, महिला ता. अध्यक्षा प्रिया खाडे, सरस्वती देवाळकर, मोहन सोनटक्के, रामचंद्र सोनटक्के, सुभाष शिरटकर, देवराव रंगारे, राजकुमार नरवाडे, गणपत चुनारकर, सुरेश उमरे, सोमाजी मुन, शाकेश उमरे, सूजर झाडे, बंडू मुन, शंकर पेगडपल्लीवार, समाधान सोनकांबळे, शैलेश चांदेकर आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)