शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

बसस्थानक परिसरात जनावरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:27 IST

शिवधुरा मोकळा करण्याची मागणी राजुरा : तालुक्यातील चनाखा सांतरी शिवधुरा आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी हा शिवधुरा अडविला. काही ...

शिवधुरा मोकळा करण्याची मागणी

राजुरा : तालुक्यातील चनाखा सांतरी शिवधुरा आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी हा शिवधुरा अडविला. काही शेतकरी धुऱ्यावर खड्डे खोदून शेतात जाण्यास अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देवीदास मून यांनी केली आहे.

विजेच्या लपंडावाने रब्बी हंगाम अडचणीत

सावली : तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी शिवारात विद्युत तारा लोंबकळत आहेत. थोडी हवा आली तरी वीज पुरवठा खंडित होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. कृषिपंपधारक शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करीत आहेत; परंतु विजेअभावी हंगामाची कामे रखडली आहेत.

अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली

पोंभुर्णा : तालुक्यातील स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक वाढली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्लास्टिक पिशव्यांना आळा घालावा

चिमूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

वणी-घुग्घुस मार्गावर अवैध जडवाहतूक

घुग्घुस : वणी मार्गावर जडवाहतूक मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामुळे अपघातही घडले आहेत. याच मार्गावर वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे कामगारांची सतत या रस्त्यावर वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

प्रवासी निवाऱ्याअभावी नागरिकांची ताटकळ

गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते; पण बसथांब्यावर प्रवासी निवारे नाहीत. नागरिक व विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.

पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा

सिंदेवाही : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अतिपावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

रस्ते बांधकामासाठी निधी मंजूर करा

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू असून, १४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेकडे निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बेरोजगार युवक-युवतींमध्ये निराशा

नागभीड : तालुक्यात हजारो विद्यार्थी पदवीपुढचे शिक्षण घेतात; पण नोकरीची हमी नाही. कोरोना काळात रोजगाराअभावी निराशा वाट्याला येऊ लागली आहे.