शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

प्राणी सेवाकेंद्र बंद पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:31 IST

पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देपाच वर्षांपासून अनुदान बंद : चाऱ्याअभावी १०० जनावरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्माणी (भद्रावती) : पिरली येथील 'पिपल्स फॉर अ‍ॅनिमल' संस्थेच्या प्राणी सुधार केंद्राला मिळणारी शासकीय मदत मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आली. त्यामुळे हे केंद्र आर्थिक संकटात सापडले आहे. केंद्रात सुमारे १०० जनावरे असून वैरणाचा खर्च कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला.तत्कालीन केंद्रीय सामाजिक न्याय तथा पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांच्या कल्पनेतून पिपल्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने देशभरात अनेक शाखा तयार केल्या आहेत. पिरली येथे डॉ. महावीर सोईतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे केंद्र सुरू करण्यात आली. सचिवपदावर भद्रावती येथील डॉ. दिलीप धोंगडे काम पाहतात. या संस्थेला श्रीहरी धोंगडे यांनी जमीन दान दिली. त्या जागेवर प्राणीसेवा केंद्र सुरू करण्यात आले. प्रारंभी भारतीय जीव जंतू कल्याण बोर्डाकडून संस्थेला अल्पशी आर्थिक मदत मिळत होती. त्यावर केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र २०१३ नंतर केंद्र सरकारची आर्थिक मदत बंद झाल्याने संस्थेचे कार्य अडचणीत आले. दरम्यान, केंद्र चालविण्यासाठी डॉ. सोईतकर यांनी पदरमोड करून दर महिन्याचा खर्च करीत होते. डॉ. धोंगडे यांनीही स्वत:ची मालमत्ता विकून केंद्राला हातभार लावणे सुरू ठेवले. पण केंद्रात १०० जनावरे व कर्मचाºयांचा खर्च सांभाळण्यासाठी ते आर्थिकदृष्ट्या हतबल झाले. कसायाकडून जप्त केलेली व अपघातातून वाचलेली अपंग जनावरे तथा गरीब शेतकºयांनी आणलेल्या शंभराहून अधिक जनावरांच्या रोजच्या वैरणाचा खर्च परवडत नाही. शासन एकीकडे गोपालनासाठी प्रोत्साहन देत असल्याची घोषणा करते तर दुसरीकडे अनुदान बंद करणे सुरू केले. त्यामुळे शहरातील गो-पालक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनताकेंद्र व राज्य शासनाने गोहत्या बंदी, गोपालन आदी विषयांवरून देशभरातील वातावरण ढवळून काढत आहेत. काही कट्टर धर्मवादी व्यक्ती अथवा संघटनांनी अस्मिताकेंद्री राजकारण करून वातावरण तापवत आहेत. पण गो-पालनासाठी प्रामाणिकपणे कार्य संस्थांना अनुदान देणे बंद केले. यावरून शेतकºयांमध्येही प्रचंड नाराजी आहे. लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने पिरली येथील केंद्र्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे. समाजातील दानदात्यांनी केंद्राला मदतीचा हात पुढे केल्यास गो-पालनाचे कार्य अविरत सुरू राहू शकेल.