शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:53 IST

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे : भांड्यात पाणी, धान्य बाहेर ठेवून पक्ष्यांचा वाचवू शकता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्थामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेत आहे. मात्र वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसाप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे.उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होत असतो. अशावेळी काहींना हीट स्ट्रोकचाही फटका बसतो. माणसात दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशु-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जावू शकतो. मांजर, कुत्रा, अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो, तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभागात व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून घराघरांत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या घागर ठेवणे गरजेचे आहे.पशु-पक्ष्यांसाठी ‘वॉटरपॉर्इंट’पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे किंवा झाडावर बांबूच्या आधारे तीन भांडी अडकवून ‘वॉटरपॉर्इंट’ तयार करावे. यावत एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसºया भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करावा. यात वॉटरपॉर्इंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. ही व्यवस्था निवासी वसाहतीतही नागरिकांनी केल्यास पशु-पक्ष्यांचे जीव वाचविण्यास मदत करता येईल.हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणा दरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य असा आहार द्यावा.अशी घ्या काळजीघरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळा चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेवून गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरात एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेवून जावे, पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

टॅग्स :Temperatureतापमान