शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:53 IST

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे : भांड्यात पाणी, धान्य बाहेर ठेवून पक्ष्यांचा वाचवू शकता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्थामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेत आहे. मात्र वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसाप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे.उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होत असतो. अशावेळी काहींना हीट स्ट्रोकचाही फटका बसतो. माणसात दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशु-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जावू शकतो. मांजर, कुत्रा, अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो, तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभागात व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून घराघरांत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या घागर ठेवणे गरजेचे आहे.पशु-पक्ष्यांसाठी ‘वॉटरपॉर्इंट’पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे किंवा झाडावर बांबूच्या आधारे तीन भांडी अडकवून ‘वॉटरपॉर्इंट’ तयार करावे. यावत एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसºया भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करावा. यात वॉटरपॉर्इंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. ही व्यवस्था निवासी वसाहतीतही नागरिकांनी केल्यास पशु-पक्ष्यांचे जीव वाचविण्यास मदत करता येईल.हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणा दरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य असा आहार द्यावा.अशी घ्या काळजीघरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळा चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेवून गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरात एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेवून जावे, पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

टॅग्स :Temperatureतापमान