शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

पशु-पक्ष्यांनाही बसत आहे तापमानाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:53 IST

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे : भांड्यात पाणी, धान्य बाहेर ठेवून पक्ष्यांचा वाचवू शकता जीव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशु-पक्ष्यांनाही होत आहे. उष्माघाताचे अनेक पशुपक्षी बळी पडत आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांना सध्या सावलीच्या आधाराची गरज आहे. या उष्माघातापासून मुक्या जिवांचा बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्थामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण गार पाणी, सरबतचा आधार घेत आहे. मात्र वाढत्या उष्माने त्रस्त पशू-पक्षांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता अंगाची लाहीलाही होत आहे. तापलेल्या उन्हामुळे माणसाप्रमाणे पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे.उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते तसेच कधी कधी नाकातून रक्तस्त्राव होत असतो. अशावेळी काहींना हीट स्ट्रोकचाही फटका बसतो. माणसात दिसून येणारी ही लक्षणे प्राण्यांमध्येही दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशु-पक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशू-पक्ष्यांना उष्मापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्माचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जावू शकतो. मांजर, कुत्रा, अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्माचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. त्यांना दम लागतो, तसेच हीटस्ट्रोक होतो. भोवळ येऊन ते पडतात, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर वनविभागात व वन्यप्रेमी मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असून घराघरांत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या घागर ठेवणे गरजेचे आहे.पशु-पक्ष्यांसाठी ‘वॉटरपॉर्इंट’पक्ष्यांना पाणी पिण्यास मिळावे म्हणून दोन झाडांच्या आधारे किंवा झाडावर बांबूच्या आधारे तीन भांडी अडकवून ‘वॉटरपॉर्इंट’ तयार करावे. यावत एका भांड्यात पाणी, एका भांड्यात धान्य आणि तिसºया भांड्यात गवत, कापूस ठेवून छोटासा बेड करावा. यात वॉटरपॉर्इंटवर पाणी पिण्यासाठी अनेक पक्षी येतात. ही व्यवस्था निवासी वसाहतीतही नागरिकांनी केल्यास पशु-पक्ष्यांचे जीव वाचविण्यास मदत करता येईल.हिरवळीचा अभावउन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी झाडांच्या सावलीचा आधार घेतात. मात्र, अलीकडे हिरवळ कमी झाल्याने प्राण्यांना सावलीसाठी आधार शोधावा लागत आहे, अशी खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करतात. ज्यांच्या घरी पाळीव जनावरे आहेत, अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणा दरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य असा आहार द्यावा.अशी घ्या काळजीघरातील पाळीव प्राण्यांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. पाळीव प्राणी बहुतांश वेळा चार भिंतीत असतात. घरातील तापमान आणि बाहेरील तापमानात फरक असतो. या प्राण्यांना सारखे घराबाहेर घेवून गेले की, ते अस्वस्थ होतात. ज्या घरात एसी आहे, अशा घरातील प्राण्यांना घराबाहेर लगेच नेल्यास त्यांनाही उष्म्याचा त्रास होतो. प्राण्यांना पहाटे किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी घेवून जावे, पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये.

टॅग्स :Temperatureतापमान