शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अंगणवाडी महिलांचा मेळावा

By admin | Updated: November 15, 2014 22:45 IST

येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.

दुर्गापूर : येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात शकुंतला वर्मा म्हणाल्या, ‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन भाजपाने सामान्य जनतेला भुरळ पाडली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र आम्हाला दिडशे दिवस लोटूनही दुर्बीन लावून देखील अच्छे दिन पहावयास मिळाले नाही. प्रा. दहीवडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे स्वयंघोषीत विकास पुरुष आहेत. आता ते राज्याचे अर्थमंत्री झाले असून महाराष्ट्र राज्यांच्या तिजोरीच्या चाब्या त्यांच्या जवळ आल्या आहेत. असे ते भाषणात जनतेला सांगतात. या तिजोरीतील पैसा ते दुर्बल घटकांकरिता वापरणार की ज्यांनी त्यांना निवडणुकीसाठी पोषक आहार दिला होता, त्यांच्यासाठी वापरणार हे आपल्याला पहावयाचे आहे. कारण अंगणवाडी सेविका मदतनिस यांना राज्य शासनाकडून मिळणारे दोन हजार रुपये मानधन गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी महिलांना देण्यात आले नाही. जुन्या सरकारने अंगणवाडी महिलांची फसवणूक केली होती आणि आता केंद्रात आणि राज्यात आलेले भाजपाचे नविन सरकार फसवणूक करणार असेल तर हे देखिल भांडवलदारधार्जीने सरकार आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. शारदा लेनगुरे म्हणाल्या, तत्कालिन केंद्र शासनाच्यावतीने ४५ वे श्रमसंमेलन बोलविण्यात आले होते. त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देण्यात यावी हे सर्व ठराव त्या संमेलनात मंजूर करण्यात आले त्या ठरावाचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.उपस्थितांचे आभार रेखा जुनघरे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लता मोटघरे, दीक्षा मोटघरे, कमल कांबळे, छाया लिहीतकर, सुशीला मेश्राम, सीमा गायधने, सुषमा तोडासे, सीमा टोंगे, भारती तिमांडे यांच्यासह अंगणवाडी महिलांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)