शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अन् ‘येडा अण्णा’ विव्हळत होता; चंद्रपूरचे वाघ मृत्यू प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:02 IST

वनविभाग कायदेशीवर कार्यवाही करीत होता आणि तिकडे ताडोबात ‘येडा अण्णा’ नावाने प्रसिद्ध असलेला वाघ जखमांनी विव्हळत होता.

ठळक मुद्देवनविभागाचे कायद्यावर बोट

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जखमी वाघावर उपचार करण्यासाठी समिती गठन करणे बंधनकारक आहे. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारेच वाघाला सुन्न करून उपचार केले जातात. वनविभाग ही कायदेशीवर कार्यवाही करीत होता आणि तिकडे ताडोबात ‘येडा अण्णा’ नावाने प्रसिद्ध असलेला वाघ जखमांनी विव्हळत होता. रविवारी सकाळी समितीने अहवाल तयार करून उपचाराची परवानगी मिळविली खरी. परंतु अवघ्या दोन तासांनीच ‘येड्या अण्णा’ने जगाचा निरोप घेतला. आता वनविभाग आणि वन्यजीव रक्षक सारवासारव करीत असल्याचे दिसून येत आहे.वाघाच्या शवविच्छेदनाचा अहवाल नॅशनल टायगर कन्झर्वेशन आॅफ अ‍ॅथारिटी (एनटीसीए)ला पाठविला आहे. त्याच्या शरीरावरील जखमा खोलवर होत्या. जखमांना अळ्या लागलेल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या ‘येडा अण्णा’ नावाच्या या वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत झालेल्या मृत्यूने पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एक वाघ २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली बिटातील तलावाजवळ असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनविभागाने दुसऱ्या दिवशी हालचाली केल्या. वाघ आणि मनुष्य संघर्षाचा अनुभव बघता तेथे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी म्हणून सुमारे ४० वनकर्मचाऱ्यांचा पहारा देण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूरहून मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी घटनास्थळाला भेट दिली. वाघाला उपचाराची गरज असल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तसा अहवाल एनटीसीएला पाठविला.शेळके यांच्या अहवालानुसार २४ फेब्रुवारी रोजी समितीचे गठण करण्यात आले. समिती दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर समितीने वाघाला उपचाराची गरज असल्याचा अहवाल एनटीसीएला व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविला. लगेच वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी व त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी नऊ जणांचे पथक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दुपारी १ वाजता घटनास्थळी हजर झाले. मात्र वाघ निपचित पडून होता. त्याची चौकशी केली असता सुमारे अर्ध्या तासापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला होता, असे वनविभागाच्या सूत्राने सांगितले. या घटनाक्रमारून वन अधिकारी एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात व्यस्त होते आणि दुसरीकडे ‘येडा अण्णा’ जखमांनी विव्हळत होता. यात ‘येडा अण्णा’चा काय दोष, असा सवाल उपस्थित केला जात आहे.वाघ हा शेड्युल वनमध्ये मोडणारा प्राणी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एनटीसीएचे काही नियम आहेत. त्याचे पालन करणे गरजेचे होते. २२ फेब्रुवारीला वाघाला पहिल्यांदा पाहिले. २३ ला स्वत: जाऊन पाहणी केली. त्यानुसार उपचाराची गरज असल्याचा अहवाल एनटीसीएला पाठविला. याआधारे २४ तारखेला समितीचे गठ न केले. त्या दिवशी ही समिती न येता ती २५ ला सकाळी आली. समितीच्या अहवालानंतर नऊ जणांची चमू घटनास्थळी दाखल झाली. मात्र वाघाचा मृत्यू झाला होता.

- विजय शेळकेमुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर.गंभीर स्वरुपाच्या जखमी वाघाला उपचाराकरिता रेस्क्यू करण्यासंदर्भात त्वरित आणि जलद निर्णय घेण्याची गरज आहे. हे या घटनेने स्पष्ट होते. या संदर्भात एनटीसीएकडे पाठपुरावा करण्यात येईल.- बंडू धोतरे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ