शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन् शेतकरी कर्मचाऱ्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला

By admin | Updated: November 7, 2015 00:40 IST

गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले.

गडचांदूर येथील घटना : वीज खंडित करायला गेला होता वीज कर्मचारीगडचांदूर : गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गडचांदुरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचेच कंबरडे मोडणारा निघाला. अत्यल्प पाऊस, सिंचनाचा अभाव, पिकांवर रोगराई यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. यात शासनानेही पिकांना अत्यल्प हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचा तगादा सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणांचा शेतकऱ्यांना वैताग आला असून याचेच पडसाद या घटनेत उमटल्याचे बोलले जात आहे.अशोक निळकंठ एकरे असे सदर शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे घराचे वीज बिल थकीत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून अनेक नोटीस दिल्यानंतरही वीज बिल न भरल्यामुळे कारवाई करायची म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ गडचांदूरचे कनिष्ठ वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांनी एकरे यांचे घर गाठले. सुरुवातीला विजेच्या खांबावरून एकरे यांचा वीज पुरवठा खंडित केला. घरचे मीटर काढायला गेल्यानंतर अशोक एकरे यांनी बिल भरण्यासाठी पुन्हा मुदत मागितली. तरीसुद्धा मीटर काढल्याने सदर शेतकऱ्याचा राग अनावर झाला. त्यामुळे शेतकऱ्याने चक्क कुऱ्हाड घेऊन वीज तंत्रज्ञावर हल्ला चढविला. वीज तंत्रज्ञ यामुळे भांबावून गेले व ते पळू लागले. तरीही शेतकऱ्याने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. दिवाळी ऐन तोंडावर आली असताना कापूस संकलन केंद्र सुरु झाले नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे आधीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना वीज वितरण कंपनीने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. सतत वीज पुरवठा खंडित होणे व शेतातील भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. अनेक तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना शून्य असल्यामुळे आधीच शेतकरी वैतागले आहे. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून होत असलेली कारवाई शेतकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. वीज वितरण कंपनीच्या विरोधात अशोक एकरे या शेतकऱ्याने घेतलेल्या पवित्र्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांच्या तक्रारीवरून अशोक एकरे यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)