शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

घनकचरा व सांडपाण्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 23, 2015 01:15 IST

शहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, ...

गोंडपिंपरी शहर : नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ? वेदांत मेहरकुळे गोंडपिंपरीशहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट या अतिसंवेदनशील बाबींसह पथदिवे व रस्त्यांची प्रमुख समस्या येथील नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक पातळीवर इंदिरानगर या वॉर्डाचे नगरपंचायत घोषणेनंतर दोन प्रभागात विभाजन झाले असून नव्याने पाडण्यात आलेल्या प्रभागांना अनुक्रमे ४ व ५ असे क्रमांक देण्यात आले आहे. इंदिरानगर स्थित नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच गंभीर आहे. शहरातील नळयोजना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात वारंवार अपयशी ठरत असून येथील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर जावे लागते. तसेच सदर परिसरात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी विल्हेवाट या प्रमुख बाबींकडे आजवर ग्रामपंचायतीने अक्ष्यम्य दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते. येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील सांडपाणी नाल्यांची सफाई न केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरुन याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती दिली. तसेच प्रभागामधील अंतर्गत रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले खडीकरण रखडले असून ठिकठिकाणी खड्डे व मोठे दगड उघडी पडल्याचे दिसून येते. या सोबत या परिसरात काही ठिकाणचे पथदिवे बंदावस्थेत असल्याने रात्री नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.तसेच प्रभागात सार्वजनिक हातपंप तर आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हातपंप मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्यामुळे नागरिकांना दूषित व फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना या प्रभागात राबविण्यात आल्या. मात्र भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे विकास कामांनाही गालबोट लागले आहे. आगामी निवडणुक तोंडावर असताना प्रभाग प्रतिनिधीत्व स्वीकारु पाहणाऱ्यांनी आजवर झालेल्या या इंदिरानगर प्रभागावरील अन्यायाबाबत काय लढा दिला, असा सवाल येथील जनतेकडून आज घडीला विचारल्या जात आहे. केवळ जनसेवेचे ढोंग रचून येथील भोळ्या भाबळ्या जनतेच्या भावनांशी खेळ करीत निवडून येणाऱ्या प्रभाग प्रतिनिधींनी आजवर येथील नागरिकांचा भ्रमनिरास करण्यापलिकडे काहीच केले नाही. या प्रभागांची समस्या सोडविण्याचे तगडे आवाहन नगरपंचायतीसमोर असून नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेवरच सर्व काही अवलंबून आहे.