शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

घनकचरा व सांडपाण्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 23, 2015 01:15 IST

शहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, ...

गोंडपिंपरी शहर : नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ? वेदांत मेहरकुळे गोंडपिंपरीशहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट या अतिसंवेदनशील बाबींसह पथदिवे व रस्त्यांची प्रमुख समस्या येथील नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक पातळीवर इंदिरानगर या वॉर्डाचे नगरपंचायत घोषणेनंतर दोन प्रभागात विभाजन झाले असून नव्याने पाडण्यात आलेल्या प्रभागांना अनुक्रमे ४ व ५ असे क्रमांक देण्यात आले आहे. इंदिरानगर स्थित नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच गंभीर आहे. शहरातील नळयोजना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात वारंवार अपयशी ठरत असून येथील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर जावे लागते. तसेच सदर परिसरात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी विल्हेवाट या प्रमुख बाबींकडे आजवर ग्रामपंचायतीने अक्ष्यम्य दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते. येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील सांडपाणी नाल्यांची सफाई न केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरुन याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती दिली. तसेच प्रभागामधील अंतर्गत रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले खडीकरण रखडले असून ठिकठिकाणी खड्डे व मोठे दगड उघडी पडल्याचे दिसून येते. या सोबत या परिसरात काही ठिकाणचे पथदिवे बंदावस्थेत असल्याने रात्री नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.तसेच प्रभागात सार्वजनिक हातपंप तर आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हातपंप मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्यामुळे नागरिकांना दूषित व फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना या प्रभागात राबविण्यात आल्या. मात्र भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे विकास कामांनाही गालबोट लागले आहे. आगामी निवडणुक तोंडावर असताना प्रभाग प्रतिनिधीत्व स्वीकारु पाहणाऱ्यांनी आजवर झालेल्या या इंदिरानगर प्रभागावरील अन्यायाबाबत काय लढा दिला, असा सवाल येथील जनतेकडून आज घडीला विचारल्या जात आहे. केवळ जनसेवेचे ढोंग रचून येथील भोळ्या भाबळ्या जनतेच्या भावनांशी खेळ करीत निवडून येणाऱ्या प्रभाग प्रतिनिधींनी आजवर येथील नागरिकांचा भ्रमनिरास करण्यापलिकडे काहीच केले नाही. या प्रभागांची समस्या सोडविण्याचे तगडे आवाहन नगरपंचायतीसमोर असून नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेवरच सर्व काही अवलंबून आहे.