शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओंकडे अडकली मोबदल्याची रक्कम

By admin | Updated: August 26, 2015 00:52 IST

सिंचन व इतर प्रकल्पांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला दिला जातो.

चंद्रपूर : सिंचन व इतर प्रकल्पांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील साडेतीन हजार पेक्षा जास्त प्रकल्पग्रस्तांचे २७ कोटी रुपये मोबदल्याची रक्कम अडकली आहे. जेव्हा की, मोबदल्याची रक्कम उपविभागीय कार्यालयांना शासनाकडून प्राप्त झाली आहे. सिंचन प्रकल्प व उद्योगांसाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादीत करण्यात आल्या. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. शेतकरी मोबदल्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. काही महिन्यांपूर्वीच वरोरा तालुक्यातील पवनी येथील प्रकल्पग्रस्तांनी मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त केले होते. मात्र, मोबदला वितरीत करण्यात प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. चिमूर, मूल व गोंडपिंपरी या तीन उपविभागीय कार्यालयांना नव्याने मंजूरी मिळाली. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून या कार्यालयांचे कामकाज सुरु आहे. मात्र, या तिनही कार्यालयाकडून ३ हजारपेक्षा अधिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला वाटप करण्यात आलेला नाही. या शेतकऱ्यांना मोबदला स्वरुपात मदत देण्यासाठी तिनही एसडीओंकडे २७ कोटीपेक्षा अधिक रक्कम शासनाकडून प्राप्त झाली आहे. मात्र मोबदला वाटप करण्यात दिरंगाईच होत आहे. मूल उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंर्तगत ५५७ प्रकल्पग्रस्त, गोंडपिंपरी १७८८ व चिमूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंर्तगत ३७१ प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर भूअर्जन अधिकारी कार्यालयाअंतर्गत ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादीत करण्याची सर्व प्रक्रिया पार पडली आहे. शासनाकडून मोबदला मंजूर झाला आणि संबधीत उपविभागीय कार्यालयांना मोबदला वितरीत करण्याचे अधिकार देण्यात आले. मात्र, मोबदला वितरीत करण्यात दिरंगाई होत आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मंजूर झाला आहे, याची कल्पनाही नाही. त्यामुळे शासनाकडून मोबदला मिळणार की, नाही या विवंचनेत शेतकरी आहेत. जिल्ह्यातील १० हजार ६९३ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाने ८९ कोटी ६ लाख २८ हजार ३४१ हजार रुपये शासनाने मंजूर केले. मात्र अद्यापही २७ कोटी रुपये वितरीत झालेले नाही. वाढीव मोबदल्यासाठी अनेकांचा नकारज्या वर्षी जमिनी भूसंपादीत झाल्या त्या वर्षी जमिनीच्या किमंती कमी असल्या तरी सध्यास्थितीत जमिनीचे दर वाढले आहेत. त्यामुळे वाढीव दराने जमिनीचा मोबदला द्यावा, अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र शासनाकडून जी रक्कम प्राप्त झाली तेवढीच रक्कम देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परिणामी अनेक प्रकल्पग्रस्तांनी मोबदला घेण्यास नकार दिला आहे. कौटुंबिक वादामुळे अडचणीप्रकल्पग्रस्तांसाठी मोबदल्याची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे कौटुंबिक वाद आहेत. मोबदला वितरीत करायचा तर कुणाला, हा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. मोबदला वितरित करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवली जात आहे. मात्र अडचणी सुटल्या नसल्याने दिरंगाई होत आहे.