शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

अंबुजा पाणी कराराने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे

By admin | Updated: December 4, 2014 23:05 IST

कोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या

रत्नाकर चटप - नांदाफाटाकोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या काळात झालेला आहे. हा करार करताना प्रथम प्राधान्य पिण्यासाठी, नंतर सिंचन व त्यानंतर उद्योगाला पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र परिस्थिती याहून उलट असून गेल्या काही वर्षापासून उद्योगाला पाणी मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याने सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या धरणाअंतर्गत ३२०० हेक्टर जमिनीवर सिंचन होईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ११०० ते १२०० हेक्टरवरच अनियमित सिंचन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा ५० टक्केही लाभ शेतकऱ्यांना घेताना दिसत नाही तर दुसरीकडे अधिकारी मात्र सिंचन झाल्याची आकडेवारी कागदावर रंगविताना दिसत आहे.या धरणाअंतर्गत नजिकच्या परिसरातील १७ गावांना पाठपुरावा करण्याचे निर्देश आहे. यासाठी विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या.मात्र पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे पिपर्डा, धानोली, वडगाव, बेलगाव, आसन, माभा, सोनुर्ली या गावांनी धरणाचे पाणी सिंचनासाठीच द्यावे, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन, तूूर, गहू, हरभरा व मिरची आदी पिक घेतली जातात. मात्र सिंचनासाठी पाणीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पेरणी खोळंबत आहे. काही शेतातील नव्याने उगवलेली रोपे पाण्याअभावी कोमेजताना दिसत आहे. तालुक्यातील ४५००० हेक्टर एकूण पिक क्षेत्र असून केवळ चार ते पाच हजार हेक्टरवरच सिंचन दिसून येते. यामध्ये बोअरवेल, विहीर, नाल्यावरुन सिंचन करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच परिस्थिती अमलनाला धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची झालेली आहे. सिंचनासाठी म्हणून ही दोन धरण बांधण्यात आली. परंतु सिंचन होत नसल्याने आता तीव्र भावना उमटताना दिसत आहे.