शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By admin | Updated: February 5, 2016 00:49 IST

हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,...

चंद्रपूर : हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील पी.एच.डी.चा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी आंबेडकरवादी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.रोहित वेमुला याच्यावर एबीव्हीपी संघटनेने खोटे-नाटे आरोप करून त्याला नक्षलवादी संबोधले. त्यावरून आमदार रामचंद्रराव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांनी कुलगुरू पी. आप्पाराव यांना रोहित वेमुला आणि त्याच्या चार मित्रांना विद्यापीठातून निलंबित केले. होस्टेलमधून काढले. त्यांना ग्रंथालय आणि मेसमध्ये येण्याची बंदी घातली तसेच त्याचे सात महिन्याचे विद्यावेतनही रोखले. त्यानंतर रोहित वेमुला याने होस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली, असे सांगण्यात येते. पण त्याचा मृत्यू संशयास्पद आहे. तसेच मुदुराई जिल्ह्यातील एका दलिताचे शव अंतिम संस्कारासाठी मुख्य रस्त्याने नेण्यास मनाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा स्थानिक प्रशासन व सरकारने काहीच कारवाई केली नाही आणि शेवटी पोलिसांनी त्याचे बळजबरीने जंगलात अज्ञात ठिकाणी दफन केले. हा २१ व्या शतकातील जातीवादाचा घृणास्पद प्रकार आहे.या दोन्ही अमानवी घटनांचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दुपारी १.३० वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर ३ वाजता धडकला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन दिले. त्यात बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे, या दोन मंत्र्यांसह आमदार एन. रामचंद्रराव, कुलगुरू पी. आप्पाराव आणि एबीव्हीपीचा नेता नंदनम सुशिलकुमार यांना अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट व सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी. रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई व कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी. दलित प्राध्यापकांचे राजीनामे स्वीकारू नयेत. रोहितच्या मित्रावरील केसेस मागे घेऊन त्यांचे विद्यावेतन त्वरित द्यावे. तसेच मदुराई जिल्हा प्रशासनातील पोलीस आणि रेव्हेन्युच्या अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा. या मागण्यात करण्यात आल्या. या शिष्टमंडळात प्रविण खोबरागडे, प्रा. एस.टी. चिकटे, अशोक निमगडे, अ‍ॅड. राकेश रंगारी, प्रतिक डोर्लीकर, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले, सविता कांबळे, राजू भगत, अल्का मोटघरे, सिद्धार्थ वाघमारे, शालिनी भगत, जयप्रकाश कांबळे, सत्यजित खोबरागडे, विशाल अलोणे, रवी मून, गोपी मित्रा आदींचा समावेश होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अतिशय शांततेने निघालेल्या मोर्चात महिला आणि युवकांची संख्या मोठी होती. मोर्चातील लोक ‘वेमुला अमर रहे’, ‘बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांना बरखास्त करा’, ‘रोहित वेमुलाच्या हत्याऱ्यांना अटक करा’ अशा घोषणा देत होते.या मोर्चात भंते कृपाशरण महाथेरो, भंत विनयबोधी, भंते अनिरूद्ध, प्रविण खोबरागडे, खुशाल तेलंग, किशोर पोतनवार, द्रोपदीबाई काटकर, अ‍ॅड. शेंडे, अ‍ॅड. उराडे, वामन सरदार, भिमलाल साव, रमेशचंद्र राऊत, तथागत पेटकर, कोमल खोब्रागडे, राजू खोबरागडे, राजेश वनकर, रवी मून, रामजी जुनघरे, हिराचंद बोरकुटे, ज्योती रंगारी, बेबीताई उईके, इंदूमती पाटील, यशोधरा पोतनवार, शंकर सागोरे, कुशाल मेश्राम, सुरेश नारनवरे, राजू किर्तक, विलास बनकर, विद्याधर लाडे, भाऊराव दुर्योधन, सुरज कदम, अ‍ॅड. लोहकरे, राजकुमार जवादे, सिद्धार्थ वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते होते. जिल्हा कचेरीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. (शहर प्रतिनिधी)