शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

झरण क्षेत्रात आश्चर्यकारक हातपंप

By admin | Updated: May 21, 2016 00:58 IST

जमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही.

पंपाची हालचाल बंद, तरीही २४ तास पाण्याचा उत्सर्ग सुरुवसंत खेडेकर बल्लारपूरजमिनीत पाण्याकरिता खोदलेल्या हातपंपाद्वारे जमिनीतील पाणी पंपाच्या हालचालीविना बाहेर उत्सर्ग होतच नाही. मात्र, एक हातपंप असेही आहे, ज्याला पंप हलविण्याची गरजच नाही. पंप न हलविताही पाणी आपोआप बाहेर येत आहे व ही क्रिया सतत २४ तास अखंडपणे सुरु आहे आणि तेही एक, दोन दिवस नव्हे तर पाण्याचा हा उत्सर्ग गेल्या २० वर्षांपासून जराही खंडीत न होता सुरु आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या तीनही ऋतूमध्ये पाण्याची सारखीच धार पडत आहे. हे आश्चर्यचकित करणारे हातपंप बल्लारपूर- गोंडपिपरी मार्गावरील निसर्गरम्य झरण या ठिकाणाहून सहा किलो मीटर अंतरावरील कन्हाळगाव या वनक्षेत्रात आहे. कन्हाळगाव हे वनग्राम वनविकास महामंडळाच्या मध्य चांदा वन प्रकल्पात येतो. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी या प्रकल्पाला पत्रकारांसह नुकतीच भेट दिली. यावेळी वन अधिकाऱ्यांनी या हातपंप स्थळी नेऊन ही किमया दाखविली. या विषयी माहिती जाणून घेतली असता, पाण्याची या भागातील गरज भागविण्याकरिता सुमारे २० वर्षाआधाही वन विभागाने बोरिंग खोदले. त्यावर हँडपंपही लावला. मात्र, हँडपंप हलविण्याची गरजच कधी भासली नाही. आतील पाणी बोरिंगने आपोआप बाहेर येणे सुरु झाले. तेव्हापासून मोठ्या धारेने पाणी बाहेर पडणे सदोदित सुरुच आहे. हे पाणी शुद्ध तसेच चवदार आहे. रात्रंदिवस सारखे बाहेर पडणारे पाणी वाहून वाया जात आहे. बोरिंग जवळच टाके बांधून पाण्याची त्यात साठवण करुन या पाण्याचा वापर वृक्ष संवर्धनाकरिता करण्यात येईल, याबाबत निश्चित काही केले जाईल, असे चंदेल म्हणाले. कन्हाळगावच्या नागरिकांनी ‘लोकमत’ला या हातपंपाबद्दल माहिती देताना सांगितले की, कित्येक वर्षापासून पाण्याचा आपोआप उत्सर्ग सुरु आहे. हे कसे होत आहे, याचे आश्चर्य आम्हालाही आहे. काहीही न करता पाणीच पाणी निघतो हे एक आश्चर्यच!