शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमराई लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 10, 2015 00:54 IST

मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत.

पिंपळगाव (भो) : मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. या आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात जर ऊन लागले असेल, शरिरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरिरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याजवळचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याच्या रसासोबत शेवया खाण्याची पद्धत आहे. आंब्याचे लोणचे ताप आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी, तोंडातील कडूपणा जाण्यासाठी ज्वारीची आंबील (कंजी) सोबत चाकायला देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्त्वाचा घटक आहे.आंब्याचे झाड इतर झाडापेक्षा उंच, विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसासाठीही याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाडे पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलाल ही आंब्याची झाडे घेत आहेत. अज्ञानी, निरक्षर शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याच्या अमरायाच मुळापासून तोडून नष्ट करीत आहेत. आज शासन गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत असल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत. कोट्यवधींचा खर्च होऊनही पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. अलिकडे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या फळाचा राजा आंब्याची होत असलेली कत्तल थांबवून तोडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये. वृक्ष तोडलेच तर त्याच जागेवर नवीन आंब्याचे झाडे लावण्याची सक्ती का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)