शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आमराई लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: April 10, 2015 00:54 IST

मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत.

पिंपळगाव (भो) : मानवी आयुष्यात आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील अमराई नामशेष होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. या आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात जर ऊन लागले असेल, शरिरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरिरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्याजवळचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याच्या रसासोबत शेवया खाण्याची पद्धत आहे. आंब्याचे लोणचे ताप आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी, तोंडातील कडूपणा जाण्यासाठी ज्वारीची आंबील (कंजी) सोबत चाकायला देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्त्वाचा घटक आहे.आंब्याचे झाड इतर झाडापेक्षा उंच, विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसासाठीही याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाडे पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलाल ही आंब्याची झाडे घेत आहेत. अज्ञानी, निरक्षर शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याच्या अमरायाच मुळापासून तोडून नष्ट करीत आहेत. आज शासन गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत असल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत. कोट्यवधींचा खर्च होऊनही पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. अलिकडे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या फळाचा राजा आंब्याची होत असलेली कत्तल थांबवून तोडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये. वृक्ष तोडलेच तर त्याच जागेवर नवीन आंब्याचे झाडे लावण्याची सक्ती का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)