शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

महाकालीच्या भाविकांसाठी उभारले पर्यायी स्नानगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:16 IST

सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या सोयीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झरपट नदीवर भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून येतात.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : भाविकांना सोईसुविधा पुरवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता राज्यभरातून भाविक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. परंतु भाविकांच्या सोयीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. झरपट नदीवर भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून येतात. त्यामुळे शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी त्या ठिकाणी भाविकांसाठी पर्यायी स्नानगृहाची व्यवस्था करून दिली आहे.महाकाली यात्रा परिसरात महापालिकेने विशेष अशी व्यवस्था केलेली दिसून येत नाही. या माता महाकाली मंदिरालगत पवित्र झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात. पण त्यांना तिथे स्नानगृहाची व्यवस्थासुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. शुक्रवारी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करताना दिसून आले. या ठिकाणी पर्यायी स्नानगृह असावे, अशी मागणी भाविकांनी जोरगेवार यांच्याकडे केली. जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्यांचा मानसिक कोंडमारा होतो. दरवर्षी हाच प्रकार सुरू असूनही मनपाने लक्ष दिले नाही. भाविकांची संख्या वाढतच आहे. मात्र, त्यांच्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत.मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दूषित पाण्यामध्ये स्नान करतात. ते पाणीसुद्धा मनपाकडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाचीसुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही. उघड्यावर शौचास बसावे लागत आहे, हे येथे येणाऱ्या भाविकांचे दुर्दैवच आहे. दर्शनाकरिता येणाºया महिला भाविकांची तर खूपच गैरसोय होत आहे. हागणदारीमुक्त शहर झाल्याचे महानगरपालिकेडून सांगितले जात आहे. मात्र यात्राकाळात ही बाब फोल असल्याचे दिसून येत आहे.शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले आहे. पण या नदीच्या पात्रामध्ये कचºयाचे ढिगारे दिसत आहे. हा केरकचरा उचलण्याचे सौजन्यही महानगरपालिकेकडून दाखविले जात नाही. भाविकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्थासुद्धा करण्यात आली नाही. भाविकांना त्य पिण्याचे शुद्ध पाणीसुद्धा दिले जात नाही. ही सुविधा त्वरीत पुरवावी, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केला आहे.