शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी

By admin | Updated: December 20, 2014 22:36 IST

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत.

आशिष देरकर - गडचांदूरग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. उमेदवारांना निवडून येण्याचे तर लोकांना विकासकामांचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेसोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार गडचांदुरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गडचांदुरात नगरपरिषदेचे सफाई कामगार स्वच्छता अभियान जरी राबवित असले तरी नियोजनाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपालिकेला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, सोबतच पाळीव प्राणी, जनावरे मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत आहे. त्यामुळे जनावराचेही आरोग्य धोक्यात आले आहे.गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-लखमापूर व गडचांदूर-राजुरा या मुख्य रस्त्यांच्या कडेला शहरालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येतात. ‘आतून स्वच्छ, बाहेर गलिच्छ’ असे दर्शन बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच होते. नगर परिषदेने उचललेला कचरा रोज पहाटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर टाकण्यात येतो. गडचांदूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याच्या प्रमाणातही फार वाढ होत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ‘स्वच्छ गडचांदूर, सुंदर गडचांदूर’ हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मात्र त्यासाठी नगरसेवकांच्या इच्छाशक्तीची गरज राहणार आहे.सडलेला भाजीपाला व केरकचरा रोज रस्त्यावर टाकण्यात येतात. यावर नगर परिषदेने कसलेही निर्बंध आणलेले नाही. तसेच झोपडपट्टी भागातील कचरा नियमित उचलल्या जात नसल्याची ओरड आहे. झोपडपट्याही नगरपरिषदेचा भाग असल्यामुळे तेथील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी गडचांदुरातील झोपडपट्टीवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)