शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसोबतच कचऱ्याचीही विल्हेवाट लावावी

By admin | Updated: December 20, 2014 22:36 IST

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत.

आशिष देरकर - गडचांदूरग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर गडचांदूर नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून गडचांदूर शहरवासीयांच्या अपेक्षाही उंचावणे सहाजिक आहेत. उमेदवारांना निवडून येण्याचे तर लोकांना विकासकामांचे डोहाळे लागले आहेत. नगरपालिकेने स्वच्छतेसोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार गडचांदुरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. गडचांदुरात नगरपरिषदेचे सफाई कामगार स्वच्छता अभियान जरी राबवित असले तरी नियोजनाअभावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगरपालिकेला मोठे अपयश येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, सोबतच पाळीव प्राणी, जनावरे मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करीत आहे. त्यामुळे जनावराचेही आरोग्य धोक्यात आले आहे.गडचांदूर-कोरपना, गडचांदूर-लखमापूर व गडचांदूर-राजुरा या मुख्य रस्त्यांच्या कडेला शहरालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे टाकण्यात येतात. ‘आतून स्वच्छ, बाहेर गलिच्छ’ असे दर्शन बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच होते. नगर परिषदेने उचललेला कचरा रोज पहाटे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर टाकण्यात येतो. गडचांदूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याच्या प्रमाणातही फार वाढ होत आहे. घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावल्यास ‘स्वच्छ गडचांदूर, सुंदर गडचांदूर’ हे स्वप्न नक्कीच साकार होईल. मात्र त्यासाठी नगरसेवकांच्या इच्छाशक्तीची गरज राहणार आहे.सडलेला भाजीपाला व केरकचरा रोज रस्त्यावर टाकण्यात येतात. यावर नगर परिषदेने कसलेही निर्बंध आणलेले नाही. तसेच झोपडपट्टी भागातील कचरा नियमित उचलल्या जात नसल्याची ओरड आहे. झोपडपट्याही नगरपरिषदेचा भाग असल्यामुळे तेथील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याची मागणी गडचांदुरातील झोपडपट्टीवासीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)