शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

By admin | Updated: May 29, 2016 01:03 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून...

आबीद अली यांची मागणी : तर प्रकल्पाची क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभगडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून १९८५ ते १९९५ च्या दशकात आदिवासी गावाच्या डोंगर पायथ्याशी कार्यान्वित झाले. अमलनाला २९३१ हेक्टर व पकड्डीगुडम २९६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या लाभ क्षेत्रात प्रस्तावित आहे. यामध्ये लाभ क्षेत्रातील २५ ते ३० गावे समाविष्ट असून जलसाठा क्षमता अमलनाला २४.२६ द.ल.घ.मी तर पकड्डीगुडम ११.०७ द.ल.घ.मी आहे. मात्र प्रस्तावित क्षेत्रात समाविष्ट केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले असून विभागाला तब्बल ३० वर्षात उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. आता या जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सय्यद आबीद अली यांनी केली आहे.प्रस्तावित लाभ क्षेत्रातील खिरडी, वडगाव, पिंपळगाव, लखमापरू, भेडवी, थुटरा, धामगणाव, वनसडी, देवघाट, सोनुर्ली, पिपर्डा या गावात अनेक शेतकरी कोरडवाहूच शेती निसर्गाच्या भरवशावर करीत आहे. तब्बल ३० वर्षे लोटूनसुद्धा ओहोटी नाल्याने पाणी वाया जात आहे. अनेक पाटचारी व लघुवितरिका अपूर्ण अवस्थेत आहे. पाणी बांद्यावर जाण्याऐवजी नाल्याच्या प्रवाहाने वाहून व्यर्थ जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व हरित क्रांतीचे स्वप्न हवेत विरघळले. मात्र पाटबंधारे विभागाकडून कचरा साफ करण्याव्यतिरिक्त दुरुस्ती हाती घेऊन सिंचने वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. उलट या प्रकल्पाचे पाणी अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट उद्योगांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे प्रस्तावित क्षेत्रात २३०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित झाले. त्याबरोबर याच प्रकल्पामधून १४ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा केला जातो. अमलनाला धरणामध्ये जलक्षेत्र २४.२६ द.श.घ.मी होते. मात्र त्या ठिकाणी गाळसाठा झाल्याने २.०८ द.श.घ.मी. पाणीसाठा कमी झाला. उलट या ठिकाणी सांंडण्याची उंची व मीटर वाढवूनसुद्धा २.८० द.श.घ.मी म्हणजेच उपयुक्त साठा २७.०६ अपेक्षित होता. तो साध्य झाला नाही, आदिवासी भागातील दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांच्या ऐवजी सिमेंट कंपन्यांना वरदान ठरले असून लाभ क्षेत्रातील अनेक गावे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. लखमापूरसारख्या गावी टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आलेली आहेत.सदर भागात उद्योग आले. मात्र उत्तरेला पैनगंगा वाहते १०० कि.मी. क्षेत्रात आदिलाबादपासून सुबई या गावापर्यंत कुठेही उच्च पातळीचा बांध नदीवर नाही. १० वर्षांपूर्वी शिवणी बॅरेजचे सर्वेक्षण झाले. त्यापुढे हे काम सरकलेच नाही. दोन्ही प्रकल्पामध्ये जंगली भागातील पालापाचोळा व गाळ साठलेला आहे. शेतीच्या जमिनीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. धरणातील जलसाठा वाढण्याससुद्धा मदत होईल. शासनाने धरणातून गाळ उपसण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आबीद अली यांनी ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)