शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी द्या

By admin | Updated: May 29, 2016 01:03 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून...

आबीद अली यांची मागणी : तर प्रकल्पाची क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभगडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम हे दोन प्रकल्प नाबार्ड व राज्यशासनाच्या निधीतून शेतीच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून १९८५ ते १९९५ च्या दशकात आदिवासी गावाच्या डोंगर पायथ्याशी कार्यान्वित झाले. अमलनाला २९३१ हेक्टर व पकड्डीगुडम २९६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाच्या लाभ क्षेत्रात प्रस्तावित आहे. यामध्ये लाभ क्षेत्रातील २५ ते ३० गावे समाविष्ट असून जलसाठा क्षमता अमलनाला २४.२६ द.ल.घ.मी तर पकड्डीगुडम ११.०७ द.ल.घ.मी आहे. मात्र प्रस्तावित क्षेत्रात समाविष्ट केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले असून विभागाला तब्बल ३० वर्षात उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. आता या जलाशयातील गाळ उपसण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते सय्यद आबीद अली यांनी केली आहे.प्रस्तावित लाभ क्षेत्रातील खिरडी, वडगाव, पिंपळगाव, लखमापरू, भेडवी, थुटरा, धामगणाव, वनसडी, देवघाट, सोनुर्ली, पिपर्डा या गावात अनेक शेतकरी कोरडवाहूच शेती निसर्गाच्या भरवशावर करीत आहे. तब्बल ३० वर्षे लोटूनसुद्धा ओहोटी नाल्याने पाणी वाया जात आहे. अनेक पाटचारी व लघुवितरिका अपूर्ण अवस्थेत आहे. पाणी बांद्यावर जाण्याऐवजी नाल्याच्या प्रवाहाने वाहून व्यर्थ जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व हरित क्रांतीचे स्वप्न हवेत विरघळले. मात्र पाटबंधारे विभागाकडून कचरा साफ करण्याव्यतिरिक्त दुरुस्ती हाती घेऊन सिंचने वाढविण्याचा प्रयत्न झाला नाही. उलट या प्रकल्पाचे पाणी अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड सिमेंट उद्योगांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे प्रस्तावित क्षेत्रात २३०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित झाले. त्याबरोबर याच प्रकल्पामधून १४ गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा केला जातो. अमलनाला धरणामध्ये जलक्षेत्र २४.२६ द.श.घ.मी होते. मात्र त्या ठिकाणी गाळसाठा झाल्याने २.०८ द.श.घ.मी. पाणीसाठा कमी झाला. उलट या ठिकाणी सांंडण्याची उंची व मीटर वाढवूनसुद्धा २.८० द.श.घ.मी म्हणजेच उपयुक्त साठा २७.०६ अपेक्षित होता. तो साध्य झाला नाही, आदिवासी भागातील दोन्ही प्रकल्प शेतकऱ्यांच्या ऐवजी सिमेंट कंपन्यांना वरदान ठरले असून लाभ क्षेत्रातील अनेक गावे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. लखमापूरसारख्या गावी टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आलेली आहेत.सदर भागात उद्योग आले. मात्र उत्तरेला पैनगंगा वाहते १०० कि.मी. क्षेत्रात आदिलाबादपासून सुबई या गावापर्यंत कुठेही उच्च पातळीचा बांध नदीवर नाही. १० वर्षांपूर्वी शिवणी बॅरेजचे सर्वेक्षण झाले. त्यापुढे हे काम सरकलेच नाही. दोन्ही प्रकल्पामध्ये जंगली भागातील पालापाचोळा व गाळ साठलेला आहे. शेतीच्या जमिनीत त्याचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. धरणातील जलसाठा वाढण्याससुद्धा मदत होईल. शासनाने धरणातून गाळ उपसण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी आबीद अली यांनी ना. गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)