शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा

By admin | Updated: July 16, 2016 01:15 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार : आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टी नुकसानीचा आढावा चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यासह विविध ठिकाणी नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे घरे, गोठे तसेच इतर नुकसानीची माहिती दिली. ज्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे, अशांना तातडीने मदत वितरीत करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. तालुकानिहाय नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करुन त्यांना आवश्यक ती मदत करा. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मदतीसाठी नुकसानीचे मूल्यांकन करताना नुकसानग्रस्तांना बऱ्यापैकी मदत मिळेल असे करा. अंशत: घरांचे नुकसान झालेल्यांना किमान तीन हजार २०० रुपये इतकी मदत मिळाली पाहिजे. अगदीच तोकड्या रकमेचे धनादेश देऊ नका. अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही तातडीने मदत वितरीत करा, असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीत काही भागामध्ये दरवर्षीच नुकसान होत असते. अशा भागांचे सर्वेक्षण करुन ठेवा. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास समन्वय व व्यवस्थापन तातडीने करता आले पाहिजे. स्वयंसेवी संस्थाची आपत्तीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे तालुकानिहाय अशा संस्थाची यादी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)