शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा

By admin | Updated: July 16, 2016 01:15 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार : आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टी नुकसानीचा आढावा चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यासह विविध ठिकाणी नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे घरे, गोठे तसेच इतर नुकसानीची माहिती दिली. ज्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे, अशांना तातडीने मदत वितरीत करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. तालुकानिहाय नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करुन त्यांना आवश्यक ती मदत करा. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मदतीसाठी नुकसानीचे मूल्यांकन करताना नुकसानग्रस्तांना बऱ्यापैकी मदत मिळेल असे करा. अंशत: घरांचे नुकसान झालेल्यांना किमान तीन हजार २०० रुपये इतकी मदत मिळाली पाहिजे. अगदीच तोकड्या रकमेचे धनादेश देऊ नका. अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही तातडीने मदत वितरीत करा, असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीत काही भागामध्ये दरवर्षीच नुकसान होत असते. अशा भागांचे सर्वेक्षण करुन ठेवा. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास समन्वय व व्यवस्थापन तातडीने करता आले पाहिजे. स्वयंसेवी संस्थाची आपत्तीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे तालुकानिहाय अशा संस्थाची यादी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)