शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा

By admin | Updated: July 16, 2016 01:15 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे.

सुधीर मुनगंटीवार : आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टी नुकसानीचा आढावा चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सतत कोसळलेल्या पावसामुळे जिल्हयात शेकडो घरांची पडझड झाली आहे. यासह विविध ठिकाणी नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन व अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे घरे, गोठे तसेच इतर नुकसानीची माहिती दिली. ज्यांचे अतिवृष्टीत नुकसान झाले आहे, अशांना तातडीने मदत वितरीत करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले. तालुकानिहाय नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार करुन त्यांना आवश्यक ती मदत करा. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मदतीसाठी नुकसानीचे मूल्यांकन करताना नुकसानग्रस्तांना बऱ्यापैकी मदत मिळेल असे करा. अंशत: घरांचे नुकसान झालेल्यांना किमान तीन हजार २०० रुपये इतकी मदत मिळाली पाहिजे. अगदीच तोकड्या रकमेचे धनादेश देऊ नका. अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही तातडीने मदत वितरीत करा, असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीत काही भागामध्ये दरवर्षीच नुकसान होत असते. अशा भागांचे सर्वेक्षण करुन ठेवा. आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास समन्वय व व्यवस्थापन तातडीने करता आले पाहिजे. स्वयंसेवी संस्थाची आपत्तीच्या वेळी चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे तालुकानिहाय अशा संस्थाची यादी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)