शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी शहरात निघाली सर्वपक्षीय रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:53 IST

वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये अनेक प्रमुख पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन जिल्हा निर्मितीच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.वरोरा नगर परिषदेची निर्मिती सुमारे दीडशे वर्षांपूर्वी झाली. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना वरोरा शहराचे भौगोलिक महत्त्व समजून त्यांनी व्यापार व उद्योगाच्या विस्तारीकरणाचे शहर म्हणून वरोºयाची निवड केली होती. अशा महत्त्वाच्या शहरालगत असणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे जगप्रसिद्ध आनंदवन, नागपूर-चंद्रपूर, यवतमाळ-कान्पा या दोन राष्ट्रीय महामार्गावरील केंद्रभागी असलेले प्रमुख ठिकाण व शैक्षणिक संस्थांचे जाळे, शासकीय कार्यालये, काही अंतरावरील ताडोबा व्याघ्र प्रकल्प, उत्तर-दक्षिण, मध्य-पश्चिम रेल्वेमार्ग, अतिरिक्त जिल्हसत्र न्यायालय, १५० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वर्धा नदी, अशा अनेक पूरक बाबींमुळे जिल्हा निर्मितीसाठी वरोरा सोयीस्कर ठिकाण आहे. त्यामुळे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये वरोºयाला स्थान द्यावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून संघर्ष समितीकडून केली जात आहे. यासाठी निवेदन, साखळी उपोषण करण्यात आले होते. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सदर मागणीकडे लक्ष वेधण्याच्या हेतूने गुरूवारी सर्वपक्षीय रॅलीचे आयोजन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अहतेशाम अली, पं. स. सभापती रोहिणी देवतळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोयर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंभुनाथ वरघणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मत्ते, राकाँचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास नेरकर, अ‍ॅड. रोशन नकवे यांची प्रमुख उपस्थिती होती.रॅलीच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांनी जिल्हा निर्मितीच्या मागणी उचलून धरली. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. प्रचंड घोषणा देत रॅली तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रॅलीमध्ये जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, नगरसेवक राजू महाजन, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, बाबा भागडे, डॉ. हेमंत खापणे, लक्ष्मण गमे, डॉ. सागर वझे, समीर बारई, अ‍ॅड. विनोद जानवे, दादा जयस्वाल, अ‍ॅड. विजय पावडे आदींसह हजारो महिला व पुरुष सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, खासदार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व अधिकाºयांकडे निवेदन पाठविण्यात आले.