शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

चंद्रपूरची ऐश्वर्या सोनकुसरे जिल्ह्यात पहिली

By admin | Updated: June 9, 2015 01:28 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८४.७४ टक्के लागला. चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची ऐश्वर्या गुरुदास सोनकुसरे ही ९८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. तिच्या पाठोपाठ सेंट अ‍ॅनस हायस्कूल सुमठाणा येथील श्वेता प्रकाश पोटे ही ९६.८० टक्के गुण घेऊन दुसरी तर ख्रिस्तानंद हायस्कूल ब्रह्मपुरी येथील स्नेहल सुधाकर लोहरकर ही ९६.६० टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. विदर्भातील निकालात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४५२ शाळांमधून ३२ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३२ हजार ६९६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. र्पैकी एकूण २७ हजार ७०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ४९८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ९ हजार २५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४९७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर चार हजार ९९१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल पाचव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे. ँमागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ७४५ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.यातील १६ हजार ६६२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७७१ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.६५ आहे. यासोबतच एकूण १६ हजार ८६ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १६ हजार ३४ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ९३६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८६.९२ आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलींनीही यावेळी चांगला निकाल दिला आहे. (शहर प्रतिनिधी)१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा४सेंट मायकल स्कूल, चंद्रपूर, कीर्ती कान्व्हेंट घुग्घुस, नगरपरिषद रय्यतवारी तेलगू शाळा, चंद्रपूर, विद्याविहार कान्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल, चंद्रपूर, विद्यानिकेतन हायस्कूल, उर्जानगर, चंद्रपूर, सेंट मॅरीस कान्व्हेंट स्कूल, दुर्गापूर, तुकडोजी ग्रामीण विद्यालय, चिंचाळा, सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर, सरस्वती विद्यामंदिर, म्हातारदेवी, घुग्घुस, चंद्रपूर पब्लिक स्कूल, चंद्रपूर, पॅरामाऊंट कान्व्हेंट हायस्कूल, बाबुपेठ, चंद्रपूर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, वेंढली, खालसा कान्व्हेंट महाकाली वॉर्ड, चंद्रपूर, न्यू डॉन पब्लिक स्कूल, तुकूम चंद्रपूर, इनरिच इंग्लिश मिडीयम स्कूल, बाबुपेठ, चंद्रपूर, एम.एब. माडेल हायस्कूल, चंद्रपूर, दिलासा ग्राम कान्व्हेंट स्कूल, बल्लारपूर, भालेराव पब्लिक स्कूल, बल्लारपूर, साईबाबा ज्ञानपीठ कान्व्हेंट, बल्लारपूर, गुरुनानक पब्लिक स्कूल, बल्लारपूर, कर्मवीर विद्यालय, जेना, भद्रावती, डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूल भद्रावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, मुर्सा, साखरवाही, श्रीमती डब्ल्यू. पोटदुखे तेलगू विद्यालय, माजरी, सेंट अ‍ॅनेज हायस्कूल, सुमठाणा, भारतीय ग्रामीण विद्यालय, कुचना, ख्रिस्तानंद स्कूल, ब्रह्मपुरी, प्रियदर्शिनी विद्यालय, नांदाफाटा, कोरपना, सेंट अ‍ॅनस हायस्कूल, मूल, माऊंट हायस्कूल, मूल, इन्फंट जेसस इंग्लिश हायस्कूल, राजुरा, स्टिल मॉरीस कान्व्हेंट स्कूल, बागसनवाडा, राजुरा, जिल्हा परिषद हायस्कूल, निमगाव, प्रविणभाऊ अडेपवार हायस्कूल, निफंद्रा, कल्पतरू इंग्लिश मिडीयम स्कूल, सिंदेवाही, नगरपरिषद नेहरू उर्दू हायस्कूल, वरोरा, पोस्ट बेसीक आश्रमशाळा, पिट्टीगुडा, जिवती.शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीणवर मातपोंभूर्णा हा ग्रामीण तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल राहिला असला तरी उर्वरित सर्व तालुक्याचा निकाल बघता शहरी विद्यार्थ्यांनी निकालात ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातून पोंभूर्णा तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ९०.५६ टक्के लागला आहे. मात्र या तालुक्यात शाळांची संख्या अतिशय कमी म्हणजे ९ आहे. तर जिवती तालुका ७५.६७ टक्के घेत पंधराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, नागभीड व चंद्रपूर या तालुक्यांनी चांगला निकाल दिला आहे.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५४.०५ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५४.०५ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ९५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार५९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५४.०५ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राविण्यप्राप्त केले आहे. ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ६५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.कॉपीमुक्त अभियानाचा जिवतीला फटकामागील वर्षी जिवती तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला होता. जिवती तालुका ९७.२७ टक्के निकाल देत जिल्ह्यात अव्वल राहिला होता. यावर्षी शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान राबविले. जिवती, कोरपना तालुक्यात या अभियानाची कडक अंबलबजावणी झाली होती. या अभियानानंतर यावर्षी जिवती तालुक्याचा निकाल इतर सर्व तालुक्याच्या तुलनेत पिछाडीवर राहिला. कॉपीमुक्त अभियान व भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिवतीचा निकाल कमी लागल्याचे बोलले जात आहे.शून्य टक्के निकाल देणाऱ्या शाळाया वर्षी दहावीच्या निकालात शून्य ते ४० टक्केदरम्यान निकाल देणाऱ्या केवळ दोनच शाळा आहेत. ज्या दोन शाळा आहेत, त्यांचा निकाल शून्य टक्के आहे. यात सेंट जोसेफ कृती विकास विद्यालय, बाबुपेठ चंद्रपूर व स्वामी नरेंद्रनाथ विद्यालय, पाटण (चिखली), जिवती या शाळांचा समावेश आहे. या दोन शाळांचा अपवाद सोडला तर जिल्ह्यातील इतर सर्व शाळांचा निकाल यंदा चांगला लागला आहे.