शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पंचायत समिती क्षेत्रात कृषी मेळावे राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:58 IST

मागील काही वर्षात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वरोरा : मागील काही वर्षात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती फायदेशीररित्या करता यावी याकरीता तज्ञांना सोबत घेऊन प्रत्येक पंचायत समितीम गणामध्ये वर्षभरात दोन ते तीन कृषी मेळावे आयोजित करण्याचा मानस आमदार बाळू धानोरकर यांनी माढेळी, नागरी, चिकणी येथील कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेटी प्रसंगी व्यक्त केला.अकाली पाऊस व वादळ आल्याने वरोरा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपासीचे झाडे जमिनीपासून उन्मळून गेले. लाल्या रोगाचा प्रादूर्भाव आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आमदार बाळू धानोरकर यांनी पंजाबराव देशमुख विद्यापीठ संशोधन केंद्र एकार्जूनाचे संशोधक प्रशांत राऊत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन, कृषी विभागाचे प्रवीण निवस्कर, कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी माढेळी येथील मनोज देवतळे, प्रमोद जामुनकर, येवतीचे चंपत चिंचोळकर, रामचंद्र येरचे यांच्या शेतात जावून गुरूवारी कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची पाहणी केली. मागील आठवड्यात झालेल्या अकाली पाऊस व वादळाचा तडाखा कपाशीच्या पिकाला बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ज्या कपाशीच्या झाडाला तडाखा बसला आहे, त्या झाडाचे संगोपन कशा पद्धतीने करावे, याचे प्रात्यक्षिक कपाशीच्या शेतात एकार्जूना फार्म हाऊसचे संशोधक प्रशांत राऊत व प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन यांनी करुन दाखवित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिले. तत्पुर्वी माढेळी येथील शेतकरी भवनामध्ये आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम माढेळीच्या सरपंच आशा हिकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आमदार बाळू धानोरकरल, जि.प.चे माजी बांधकाम व अर्थ सभापती प्रकाशचंद्र मुथा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माढेळीचे उपसरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख विशाल बदखल, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी पंचायत समिती उपसभापती दत्ता बोरेकर, माढेळी ग्राम पंंचायतच्या सदस्य नानेबाई वाळके उपस्थित होत्या. नागरी व चिकणी येथे शेतकऱ्यांना माजी पंचायत समिती सभापती दिलीप टिपले, चिकणी उपसरपंच किशोर बांधे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करुन तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश कृषी विभागास आमदार बाळू धानोरकर यांनी देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी दिले.