शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पंचायत समिती क्षेत्रात कृषी मेळावे राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:58 IST

मागील काही वर्षात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

वरोरा : मागील काही वर्षात ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती फायदेशीररित्या करता यावी याकरीता तज्ञांना सोबत घेऊन प्रत्येक पंचायत समितीम गणामध्ये वर्षभरात दोन ते तीन कृषी मेळावे आयोजित करण्याचा मानस आमदार बाळू धानोरकर यांनी माढेळी, नागरी, चिकणी येथील कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेटी प्रसंगी व्यक्त केला.अकाली पाऊस व वादळ आल्याने वरोरा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपासीचे झाडे जमिनीपासून उन्मळून गेले. लाल्या रोगाचा प्रादूर्भाव आल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आमदार बाळू धानोरकर यांनी पंजाबराव देशमुख विद्यापीठ संशोधन केंद्र एकार्जूनाचे संशोधक प्रशांत राऊत, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन, कृषी विभागाचे प्रवीण निवस्कर, कृषी अधिकारी, कर्मचारी यांनी माढेळी येथील मनोज देवतळे, प्रमोद जामुनकर, येवतीचे चंपत चिंचोळकर, रामचंद्र येरचे यांच्या शेतात जावून गुरूवारी कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची पाहणी केली. मागील आठवड्यात झालेल्या अकाली पाऊस व वादळाचा तडाखा कपाशीच्या पिकाला बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ज्या कपाशीच्या झाडाला तडाखा बसला आहे, त्या झाडाचे संगोपन कशा पद्धतीने करावे, याचे प्रात्यक्षिक कपाशीच्या शेतात एकार्जूना फार्म हाऊसचे संशोधक प्रशांत राऊत व प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी अशोक खंगन यांनी करुन दाखवित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिले. तत्पुर्वी माढेळी येथील शेतकरी भवनामध्ये आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम माढेळीच्या सरपंच आशा हिकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी आमदार बाळू धानोरकरल, जि.प.चे माजी बांधकाम व अर्थ सभापती प्रकाशचंद्र मुथा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माढेळीचे उपसरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख विशाल बदखल, जिल्हा परिषद सदस्य नितीन मत्ते, माजी पंचायत समिती उपसभापती दत्ता बोरेकर, माढेळी ग्राम पंंचायतच्या सदस्य नानेबाई वाळके उपस्थित होत्या. नागरी व चिकणी येथे शेतकऱ्यांना माजी पंचायत समिती सभापती दिलीप टिपले, चिकणी उपसरपंच किशोर बांधे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करुन तातडीने अहवाल तयार करण्याचे आदेश कृषी विभागास आमदार बाळू धानोरकर यांनी देत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी दिले.