शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये

By admin | Updated: October 26, 2016 01:19 IST

शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावल्यामुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचेप्रमाण वाढत आहे.

महावितरणचे आवाहन : रोहित्र जळण्याच्या घटना टाळण्याचा प्रयत्नचंद्रपूर: शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावल्यामुळे रोहित्रावरील भार वाढून ते जळण्याचेप्रमाण वाढत आहे. परंतु अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅटोस्विचचा वापर करु नये, असे आवाहन महावितरणे केले आहे.राज्यात सुमारे ३९ लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना महावितरणकडून दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप सुरू करण्याचा त्रास वाचविण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप सुरू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकऱ्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपाना आॅटोस्विच लावू नये. तसेच इतर शेतकऱ्यांनी ते लावले असल्यास काढून टाकण्याची विनंती करावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी राहील असे वीज कंपनीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)आॅटोस्विच ऐवजी कॅपॅसिटर लावाकृषिपंपधारक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला कपॅसिटर बसवावा. त्यामुळे वीज बचत होऊन पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो. कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांनी कमी होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाणही कमी होते. या सर्वाचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे त्यांनी कपॅसिटरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.