शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला दहा हजारामध्येच करावा लागणार कृषी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:44 IST

राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.

ठळक मुद्देपंचायत समितीला पाच हजार खर्च करण्याची मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली कामगिरी लक्षात घेऊन १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दिन साजरा करण्याची शासनाने परवानगी दिली असून खर्चाची मर्यादाही आखून दिली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेला १० हजार तर पंचायत समितीला केवळ ५ हजारात हा कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील उपलब्ध अनुदानातच हा खर्च भागवावा लागणार आहे.कृषी दिन साजरा साजरा करण्याबाबत राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. यामध्ये खरीप हंगाम सुरु असल्यामुळे राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बांधावर जावून पीक निरीक्षक, गावागावांत शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी लागणार आहे. कृषी विभागाला यासंदर्भात आराखडा तयार करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम साजरा करावा लागणार आहे.कृषी दिन साजरा करण्यासाठी राज्यातील ३५५ पंचायत समितींकरिता १७ लाख ७५ हजार रुपये तसेच ३४ जिल्हा परिषदेला ३ लाख ४० हजार रुपये अशा एकूण २१ लाख १५ हजार रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे.अधिकारी, पदाधिकाऱ्यांची कसरतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रम करण्यास तसेच खर्चाची मर्यादा ठरवून दिली आहे. मात्र पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांना या अल्प खर्चात कार्यक्रम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार