शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसाठी गायत्री परिवारासोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:29 IST

गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याला मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गायत्री परिवाराने महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवड मोहिमेत यापूर्वीही मोठे योगदान दिले आहे. यापुढेही गायत्री परिवाराचे वृक्ष लागवडीच्या कामांमध्ये वनविभागामार्फत सहकार्य घेतले जाईल. त्यासाठी लवकरच परस्पर सामंजस्य करार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे केले.चंद्रपूर जिल्ह्यातील पंच-सरपंच मेळाव्याचे गायत्री परिवाराने आयोजन केले होते. या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. हरिद्वार येथील शांती कुंज गायत्री परिवारमार्फत चंद्रपूरमध्ये दाताळा रोड येथे जिल्ह्यातील पंच- सरपंच व युवा संगोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गायत्री परिवाराचे हरिद्वार येथील योगेंद्र गिरी, नागपूर छत्रपती योगीराज बल्की, सुनील शर्मा, भास्कर पेरे पाटील, पर्यावरण तज्ज्ञ सुरेश राठी, मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नामदेव डाहुले आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, देशाला बळकट करण्यासाठी प्रत्येक गावाचे दायित्व असले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशात रामराज्य आले पाहिजे, असे वाटते. मात्र यासाठी प्रत्येक गावाने नव्हे, तर प्रत्येक गावातील, प्रत्येक व्यक्तीने आपले दायित्व देणे महत्त्वाचे आहे. मानवाच्या जन्मात आल्यानंतर त्याचे जगणे त्यागी असले पाहिजे. हा देश त्यागाची भूमी म्हणून ओळखला जातो. स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगण्याची जी संकल्पना गायत्री परिवाराने समाजात रुजविली आहे, त्या संकल्पनेचा त्यांनी यावेळी गौरव केला. राज्य शासनाने यापूर्वी राबविलेल्या वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवाराने मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी गायत्री परिवाराचे सदस्य आहे. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आगामी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये गायत्री परिवारासोबत वनविभाग राज्यस्तरीय सामंजस्य करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले. वृक्ष लागवडीमध्ये गायत्री परिवारांनी आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.