शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:55 IST

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण : कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक धोक्यात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वादळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. शेतात सध्या कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक असल्याने क्षणार्धात पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकºयांच्या काळजाची धडधड पुन्हा वाढली आहे.दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसामुळे शेतातील पीक पूर्णत: मातीमोल होण्याचा धोका आहे. यावर्षी बोंड अळीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. बोंड अळीने यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात दर नसल्याने शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे. रब्बी माल शेतकºयांच्या अजूनही शेतात आहे. कापूस वेचणीला अजूनही मजूर मिळत नसल्याने लाखो रुपयांचा कापूस शेतातच आहे. १० ते १३ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.कापूस, गहू, हरभरा, मिरची ही नगदी पिके निघायला पुन्हा काही दिवसांचा कालावधी आहे. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस येण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी आणि सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी शेतकरी पार काकुळतीला आला आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षी उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला.बोंड अळीने कापसाला पुर्णत: खाऊन टाकले. कापसाचे ५० टक्के उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही. कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोईवर असतानाच कापसाचे दर चारशे-पाचशे रुपयांनी खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट पुरता कोलमडून गेला आहे. ढगाळ वातावरणाने वादळी पावसासह जिल्ह्यात गारपीट होण्याची दाट शक्यता असून शेतपिकांना चांगलाच तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रूयावर्षी शेतकºयांची निसर्ग जणू परीक्षाच घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. ढगाळ वातावरणाने शेतकºयांची चिंता पुन्हा वाढली आहे. लाखो रुपयांचा शेतमाल शेतात असल्याने कोणत्याही क्षणी गारपीट झाली तर शेतकºयांच्या हाती काहीच लागणार नाही.सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, गहू, हरभरा, मिरची, तूर आदी पिके आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्याने केव्हाही गारपीट होऊन शेतातील पीक मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- भास्कर जुनघरी,शेतकरी, गोवरी.