शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:55 IST

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण : कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक धोक्यात

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने वादळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. शेतात सध्या कापूस, गहू, मिरची, हरभरा पीक असल्याने क्षणार्धात पीक उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकºयांच्या काळजाची धडधड पुन्हा वाढली आहे.दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसामुळे शेतातील पीक पूर्णत: मातीमोल होण्याचा धोका आहे. यावर्षी बोंड अळीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. बोंड अळीने यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात दर नसल्याने शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे. रब्बी माल शेतकºयांच्या अजूनही शेतात आहे. कापूस वेचणीला अजूनही मजूर मिळत नसल्याने लाखो रुपयांचा कापूस शेतातच आहे. १० ते १३ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यासह विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.कापूस, गहू, हरभरा, मिरची ही नगदी पिके निघायला पुन्हा काही दिवसांचा कालावधी आहे. परंतु वातावरणात अचानक बदल झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस येण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी आणि सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यावर्षी शेतकरी पार काकुळतीला आला आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षी उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला.बोंड अळीने कापसाला पुर्णत: खाऊन टाकले. कापसाचे ५० टक्के उत्पादनही शेतकºयांना घेता आले नाही. कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोईवर असतानाच कापसाचे दर चारशे-पाचशे रुपयांनी खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट पुरता कोलमडून गेला आहे. ढगाळ वातावरणाने वादळी पावसासह जिल्ह्यात गारपीट होण्याची दाट शक्यता असून शेतपिकांना चांगलाच तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रूयावर्षी शेतकºयांची निसर्ग जणू परीक्षाच घेत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार वाईट आहे. मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. ढगाळ वातावरणाने शेतकºयांची चिंता पुन्हा वाढली आहे. लाखो रुपयांचा शेतमाल शेतात असल्याने कोणत्याही क्षणी गारपीट झाली तर शेतकºयांच्या हाती काहीच लागणार नाही.सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कापूस, गहू, हरभरा, मिरची, तूर आदी पिके आहेत. वातावरणात अचानक बदल झाल्याने केव्हाही गारपीट होऊन शेतातील पीक मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.- भास्कर जुनघरी,शेतकरी, गोवरी.