शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:35 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही,

विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावाचंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार, असे म्हणून शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जमाफी मिळेपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रह्मपुरी येथे शनिवारी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, स्मिता पारधी, प्रमोद चिमूरकर, सतीश वारजूरकर, गजानन बुटके, पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर, नगरसेविका फुलझले, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबले, माजी नगरसेवक विलास विखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उराडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव नाही अशा अस्मानी संकटाच्या कचाट्यात अडकून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. गेल्या अडीच वर्षात आठ हजार पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी सुद्धा भाजप सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्यात नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष व सर्व काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)