शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:35 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही,

विजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावाचंद्रपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर विकास कामासाठी पैसेच राहणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करणार, असे म्हणून शेतकऱ्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मात्र काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कर्जमाफी मिळेपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे उपगट नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ब्रह्मपुरी येथे शनिवारी तालुका काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे, स्मिता पारधी, प्रमोद चिमूरकर, सतीश वारजूरकर, गजानन बुटके, पं. स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर, नगरसेविका फुलझले, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगला लोनबले, माजी नगरसेवक विलास विखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उराडे यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, निसर्गाची अवकृपा, शेतमालाला भाव नाही अशा अस्मानी संकटाच्या कचाट्यात अडकून शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. गेल्या अडीच वर्षात आठ हजार पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेली आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी सुद्धा भाजप सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्यात नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, प. स. सदस्य थानेश्वर कायरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा मंगला लोनबले, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष व सर्व काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)